रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच विराट कोहलीही आयपीएल खेळत राहणार आहे.

भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्थगित झाली नसती तर नियोजनाप्रमाणे आयोपीएल २५ मे पर्यंत होती. पण तणाव वाढल्यामुळे आठ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आला. आता भारताची पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही थेट इंग्लंडमध्येच होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड होण्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील. भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करावा लागेल. ही सर्व प्रक्रिया बीसीसीआय पुढील काही दिवसांत पूर्ण करणार आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करेल. तसेच कसोटी संघात कोणत्या नव्या खेळाडूंना संधी द्यावी याचाही विचार करेल.

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने १२३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात नाबाद २५४ धावा ही विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी आहे.

रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

रोहित शर्माने ६७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. त्याने बारा शतके आणि अठरा अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात २१२ धावा ही रोहित शर्माची सर्वोत्तम खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने गोलंदाज म्हणून ३८३ चेंडू टाकले आणि दोन बळी घेतले आहेत.

 
Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित