रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच विराट कोहलीही आयपीएल खेळत राहणार आहे.

भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्थगित झाली नसती तर नियोजनाप्रमाणे आयोपीएल २५ मे पर्यंत होती. पण तणाव वाढल्यामुळे आठ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आला. आता भारताची पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही थेट इंग्लंडमध्येच होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड होण्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील. भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करावा लागेल. ही सर्व प्रक्रिया बीसीसीआय पुढील काही दिवसांत पूर्ण करणार आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करेल. तसेच कसोटी संघात कोणत्या नव्या खेळाडूंना संधी द्यावी याचाही विचार करेल.

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने १२३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात नाबाद २५४ धावा ही विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी आहे.

रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

रोहित शर्माने ६७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. त्याने बारा शतके आणि अठरा अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात २१२ धावा ही रोहित शर्माची सर्वोत्तम खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने गोलंदाज म्हणून ३८३ चेंडू टाकले आणि दोन बळी घेतले आहेत.

 
Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए