रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच विराट कोहलीही आयपीएल खेळत राहणार आहे.

भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्थगित झाली नसती तर नियोजनाप्रमाणे आयोपीएल २५ मे पर्यंत होती. पण तणाव वाढल्यामुळे आठ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आला. आता भारताची पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही थेट इंग्लंडमध्येच होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड होण्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील. भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करावा लागेल. ही सर्व प्रक्रिया बीसीसीआय पुढील काही दिवसांत पूर्ण करणार आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करेल. तसेच कसोटी संघात कोणत्या नव्या खेळाडूंना संधी द्यावी याचाही विचार करेल.

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने १२३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात नाबाद २५४ धावा ही विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी आहे.

रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

रोहित शर्माने ६७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. त्याने बारा शतके आणि अठरा अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात २१२ धावा ही रोहित शर्माची सर्वोत्तम खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने गोलंदाज म्हणून ३८३ चेंडू टाकले आणि दोन बळी घेतले आहेत.

 
Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक