पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

  142

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहे. महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आल्यानं पाकिस्तानची पळापळ सुरु झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.


पाकिस्तानी सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल शाहीर शमशाद मिर्झा मुनीरची जागा घेऊ शकतात. पाकिस्तानच्या सेनादलाचा प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील इम्रान खान याचे समर्थक देखील रस्त्यावर उतरून त्यांना जेलमधून सोडण्याची मागणी करीत आहेत.


एकंदर पाकिस्तान सरकारविरोधात देशातील नागरिकांचा रोष वाढलेला दिसून येत आहे. तर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या आंदोलन सुरु झालं आहे. बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीनं शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांना हटवण्याची मागिणी केलीय. तर, बलुचिस्तान फ्रीडम फायटर्सकडून पाकिस्तानवरच हल्ला करण्यात आला आहे. यामुळं पाकिस्तान दुहेरी अडचणीत सापडला आहे.

Comments
Add Comment

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या