IPL 2025 स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि बीसीसीआय चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. सध्या तणावामुळे सुरक्षा पथकांवर कामाचा ताण आहे. यामुळेच आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.





आतापर्यंत आयपीएलचे ५८ साखळी सामने झाले होते. गुजरात टायटन्स पहिल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, पंजाब किंग्स तिसऱ्या, मुंबई इंडियन्स चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स पाचव्या, कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या, लखनऊ सुपर जायंट्स सातव्या, सनरायझर्स हैदराबाद आठव्या, राजस्थान रॉयल्स नवव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानावर आहे.


यंदाच्या आयपीएलमध्ये ७० साखळी सामने, दोन पात्रता सामने अर्थात क्वालिफायर, एक बाद फेरीचा सामना अर्थात एलिमिनेटर आणि अंतिम सामना अर्थात फायनल असे एकूण ७४ सामने खेळवण्याचे नियोजन होते. यापैकी ५८ वा साखळी सामना सुरू असतानाच धरमशाला येथे ब्लॅकआऊट करण्यात आले. खेळाडूंना सुरक्षितरित्या हॉटेलवर पाठवण्यात आले. प्रेक्षकांनाही स्टेडियम सोडून शांतपणे घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतरच आयपीएल २०२५ वर अनिश्चिततेचे सावट घोंगावत होते. अखेर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला.


भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. धमरशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रिकामे करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी वंदे भारत एक्सप्रेसची व्यवस्था केली होती.

Comments
Add Comment

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.