IPL 2025 स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित

  93

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि बीसीसीआय चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. सध्या तणावामुळे सुरक्षा पथकांवर कामाचा ताण आहे. यामुळेच आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.





आतापर्यंत आयपीएलचे ५८ साखळी सामने झाले होते. गुजरात टायटन्स पहिल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, पंजाब किंग्स तिसऱ्या, मुंबई इंडियन्स चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स पाचव्या, कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या, लखनऊ सुपर जायंट्स सातव्या, सनरायझर्स हैदराबाद आठव्या, राजस्थान रॉयल्स नवव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानावर आहे.


यंदाच्या आयपीएलमध्ये ७० साखळी सामने, दोन पात्रता सामने अर्थात क्वालिफायर, एक बाद फेरीचा सामना अर्थात एलिमिनेटर आणि अंतिम सामना अर्थात फायनल असे एकूण ७४ सामने खेळवण्याचे नियोजन होते. यापैकी ५८ वा साखळी सामना सुरू असतानाच धरमशाला येथे ब्लॅकआऊट करण्यात आले. खेळाडूंना सुरक्षितरित्या हॉटेलवर पाठवण्यात आले. प्रेक्षकांनाही स्टेडियम सोडून शांतपणे घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतरच आयपीएल २०२५ वर अनिश्चिततेचे सावट घोंगावत होते. अखेर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला.


भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. धमरशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रिकामे करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी वंदे भारत एक्सप्रेसची व्यवस्था केली होती.

Comments
Add Comment

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय