भारताने १५ मेपर्यंत २४ एअरपोर्ट केले बंद, पाक तणावादरम्यान मोठा निर्णय

नवी दिल्ली: नागरी उड्डाण मंत्रालयाने भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान देशातील २४ एअरपोर्टवर देशांतर्गत येण्याजाण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी आता १५ मे सकाळी ५.२९ वाजेपर्यंत असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एअरपोर्टवर विमाने उड्डाण करणार नाहीत.


पंजाबचे अमृतसर, लुधिया, पटियाला, बठिंडा, हलवाडा, पठाणकोट हे एअरपोर्ट बंद राहतील. तर हिमाचल प्रदेशाचे भुंतर शिमला, कांगडा-गग्गल एअरपोर्ट बंद राहतील. केंद्रशासित प्रदेश चंदीगड एअरपोर्ट, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे श्रीनगर, जम्मू, लेह एअरपोर्ट, राजस्थानचे किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर एअरपोर्ट आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज एअरपोर्ट बंद राहतील.



एअरलाईन्सची प्रतिक्रिया


एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक एअरपोर्टसाठी आपल्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाईट स्थिती जाणून घेण्यासाठी, पुन्हा बुक करण्यासाठी अथवा रिफंडसाठी लिंक शेअर केल्या आहेत. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढले आहेत. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष्य बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

Comments
Add Comment

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी

PM Modi - Meloni : ‘मोदींचा ऐतिहासिक महाविक्रम!’ थेट इटलीवरून आल्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग