Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'!

  43

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट


देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून उठण्यापूर्वीच भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत नऊ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केलं. तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय.


पहलगाममधील दहशतवाही हल्ल्याचा भारताने बदला घेतलाय. भारताचे सैन्य दल, वायुसेना आणि नौसेना यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाय. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताने दहशतवाद्यांचे ९ तळ उदध्वस्त करत चांगलाच धडा शिकवलाय.


?si=UzwCJT1tGF5znFeb

भारताने दहशतवाद्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर हल्ला केलाय. बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट या ठिकाणांवर स्ट्राईक केलाय. बहावलपूर आणि कोटली हे दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आहेत. भारताच्या स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना मोठा फटका बसलाय. वायुदलाने केलेल्या अचूक हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झालीय. पहलगाम हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्याने पाकिस्तान बिथरलंय.



पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी नवविवाहित जोडप्यांना लक्ष केलं होतं. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वी करून दाखवलं.'सिंदूर'हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचे प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे. सिंदूर हे योद्ध्यांचेही प्रतीक आहे. पूर्वी युद्धात जाण्यापूर्वी योद्धा कपाळावर सिंदूरचा टिळा लावत असत.


भारतीय वायुसेना आणि सैन्य दल यांनी एकत्रित ही कारवाई केली. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येतेय. इतकंच नव्हे तर पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही नष्ट करण्यात आली आहेत. एफ 16 आणि एफ 17 आकाशात नष्ट करण्यात आलीत. आकाश मिसाईलने पाकिस्तानच्या दोन्ही लढावू विमानांना लक्ष केलंय. भारताने आखलेल्या आणि यशस्वी केलेल्या ऑपरशेन सिंदूर मोहिमेचं तमामा भारतीयांनी स्वागत केलंय. भारताने पुन्हा एकदा स्ट्राईक करून जगाचं लक्ष वेधलंय आणि पाकिस्तानला इशारा दिलाय.

Comments
Add Comment

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक