Operation Sindoor: पंतप्रधान मोदींनी केले भारतीय सैन्याचे कौतुक, म्हणाले "संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण"

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) बद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.



ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान


पहलगाम हल्ल्यात महिलांचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्वस्त करत, भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ल्यात मृत पावलेल्या २६ जणांना न्याय मिळवून दिला आहे. यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने फतेह मिळवला. भारताच्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला खरा, पण या हल्ल्याची बातमी मिळताच देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिले विधान केले आहे.


ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारताच्या तिन्ही सैन्यांचे अभिनंदन करताना त्यांनी सांगितले की "भारतीय सैन्याने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. आणि हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे."



पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील


या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि देशाच्या सद्य परिस्थितीची माहिती देतील अशी माहिती समोर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होतील.



कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब ठार


भारतीय सैन्याने काल रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. त्याच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा यात मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचा ते कधीच आदर करणार नाहीत", नितेश राणे यांची काँग्रेसवर टिका

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वादावर नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबाचे समर्थक म्हटले मुंबई: कर्नाटक मेट्रो

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात