Operation Sindoor: पंतप्रधान मोदींनी केले भारतीय सैन्याचे कौतुक, म्हणाले "संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण"

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) बद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.



ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान


पहलगाम हल्ल्यात महिलांचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्वस्त करत, भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ल्यात मृत पावलेल्या २६ जणांना न्याय मिळवून दिला आहे. यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने फतेह मिळवला. भारताच्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला खरा, पण या हल्ल्याची बातमी मिळताच देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिले विधान केले आहे.


ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारताच्या तिन्ही सैन्यांचे अभिनंदन करताना त्यांनी सांगितले की "भारतीय सैन्याने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. आणि हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे."



पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील


या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि देशाच्या सद्य परिस्थितीची माहिती देतील अशी माहिती समोर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होतील.



कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब ठार


भारतीय सैन्याने काल रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. त्याच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा यात मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण

येत्या १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत कृष्ठरोग शोध अभियान, सुमारे ४९ लाख नागरिकांची होणार तपासणी मुंबई (खास

घाटकोपर झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला

आणखी ३७ बांधकामांवर महापालिकेची कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते