Operation Sindoor : भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला,रात्री १.३० वाजता एअरस्ट्राईक आणि रडत राहिला पाकिस्तान

नवी दिल्ली: २२ एप्रिल २०२५, तो काळा दिवस जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे २६ निर्दोष लोकांना मारले. केवळ जीवच घेतला नाही तर असे घाणेरडे कृत्य केले ज्याने संपूर्ण मानवतेला काळिमा फासला जाईल. ज्या निर्दोष लोकांना मारण्यात आले त्यांना त्यांचा आधी धर्म विचारण्यात आला.


या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश केंद्रातील मोदी सरकारकडून दहशतवादाविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी करत होता. प्रत्येकाला वाटत होते निर्दोष लोकांच्या मृत्यूचा बदला भारतीय लष्करांने या दहशतवाद्यांना मारून घ्यावा.


हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे दहशतवादाविरोधात कडक कारवाईची घोषणा केली होती. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल. मोदी म्हणाले होते की प्रत्येक दहशतवादी आणि त्याचे समर्थन करणाऱ्या ओळख पटवेल आणि त्याला शिक्षा दिली जाईल. दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आलीये



मधुबनीमध्ये दिलेला शब्द झाला पूर्ण


७ एप्रिल २०२५ ही तारीख जी पाकिस्तान नेहमी लक्षात ठेवेल. दहशतवादाच्या पनाहगर पाकिस्ताना भारतीय सैन्याने एकामागोमाग एक ९ एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.



रात्री १.४४ वाजता दिली एअरस्ट्राईकची माहिती, रडत राहिला पाकिस्तान


भारताच्या सशस्त्र दलांनी पहलगाम हल्ल्यानंतर दोन आठवड्यानंतर कडक कारवाई करताना मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मिसाईलने हल्ला केला. यात दहशतवादी लष्कर-ए-मोहम्मदचा गड बहावलपूरचाही समावेश आहे.


संरक्षण मंत्रालयाने रात्री उशिरा १.४४ वाजता एका विधानात म्हटले की लष्कराने हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केले आहे.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत