Operation Sindoor: सेलिब्रेटींनी दिल्या 'भारत माता की जय' च्या घोषणा, सैन्याच्या कामगिरीला केला सलाम

मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर दिले आहे. मंगळवारी रात्री भारताकडून पाकिस्तानात मोठा एअरस्ट्राईक करण्यात आला. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओके स्थित एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक करण्यात आला.


रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई भारताकडून करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबाचे ३ आणि हिजब्बुल मुजाहिदीच्या २ दहशतवादी ठिकाणांना यावेळी लक्ष्य करण्यात आले. ही कारवाई भारताचे लष्कर, हवाईदल आणि नौदलाने एकत्रितरित्या केली.



ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूडकरांची प्रतिक्रिया


ऑपरेशन सिंदूरला देशवासियांनी पाठिंबा देताना भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला आहे. भारताच्या बॉलिवूड कलाकारांनी भारतीय लष्कराने केलेल्या एअरस्ट्राईकबद्दल विधान केले आहे. सगळ्यांनी जय हिंद अशा घोषणा करत आपल्या भारतीय लष्कराला सलाम केला आहे.


बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने एक्सवर लिहिले, जय हिंद की सेना...भारत माता की जय.

 


सिनेनिर्मात मधुर भांडारकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी लिहिले, आमच्या प्रार्थना सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आम्ही एकत्र उभे आहोत. जय हिंद वंदे मातरम...








 

अभिनेत्री निमरत कौरने इन्स्टावर ऑपरेशनर सिंदूवर प्रतिक्रिया देताना म्हटले, आम्ही लष्करासोबत आहोत. आमचा देश, एक मिशन, जय हिंद,






परेश रावल, अनुपम खेर, विनीत कुमार सिंह आणि राहुल वैद्य यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Comments
Add Comment

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मन्नत मध्ये रूम मिळेल का? या प्रश्नावर शाहरुख खानचे "हे" मिश्किल उत्तर

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने गुरुवारी ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्या ट्विटर पेजवर 'Ask SRK' सेशन ठेवत

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाची फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

मुंबई : मागील काही वर्षात मराठी चित्रपटांची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. नुकताच 'नाळ २' या सिनेमाला

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय