वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई; ४८,००० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांना ई-चलान

मुंबई : मुंबईत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तब्बल ४८,००० हून अधिक ई-चलान फाडले आहेत. ही कारवाई १८ एप्रिलपासून ४ मेपर्यंत करण्यात आली. संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारेंच्या देखरेखीखाली ही विशेष मोहीम पार पडली.


मोहीमेत सर्वाधिक कारवाई प्रवाशांना प्रवासासाठी नकार देणाऱ्या वाहनचालकांविरोधात झाली. तब्बल २८ हजार ८१४ चालकांनी ग्राहकांना नेण्यास नकार दिला, ज्यावर थेट दंडात्मक कारवाई झाली. त्याशिवाय १,१६४ चालकांनी वर्दी न घालणे, ६ हजार २६८ चालकांनी ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक प्रवासी घेणे आणि १२ हजार १७१ जणांनी अन्य वाहतूक नियमांचा भंग केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली.



या संपूर्ण मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ४०.२५ लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे प्रवासास नकार दिलेल्या २८ हजार ८१४ चालकांचे लायसन्स निलंबित करण्याची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) सुरू आहे.


मुंबईकरांना त्रास देणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आता पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ट्रॅफिक पोलिसांची ही कारवाई पुढील काळातही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)