Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी आता राज्यातील तहानलेल्या व पाणीटंचाईग्रस्त गावांमध्येच प्राधान्याने वापरण्यात येणार आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या नावाखाली यापूर्वी मनमानी पद्धतीने होणाऱ्या खर्चाला वेसण घालण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत या संपूर्ण निधीच्या वापरावर नजर ठेवण्यात येणार आहे.



गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मोहिमे’अंतर्गत राज्यातील घरोघरी नळ पोहोचवले गेले असले, तरी उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे अनेक गावांना पाण्यासाठी आजही वणवण भटकंती करावी लागते. हे वास्तव लक्षात घेऊन आता भूजल पुनर्भरण आणि संवर्धनाचे निधी वाटप निश्चित निकषांच्या आधारे केले जाणार आहे. या नव्या धोरणानुसार, ज्यांच्या घरी जल जीवन मोहिमेतून नळ पोहोचले आहेत, त्यांना वर्षभर सुरळीत पाणी उपलब्ध राहावे, या उपायांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल.



याशिवाय अतिशोषित आणि तीव्र पाणीटंचाईग्रस्त (ओसीएस) क्षेत्रांपैकी १६ टक्के क्षेत्र सुरक्षित करणे, उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावी लागणारी गावे टँकरमुक्त करण्यासाठीच्या उपाययोजना, तसेच सध्या सुरक्षित असलेल्या भूजल क्षेत्रांचे भविष्यातील अतिउपशापासून संरक्षण करणे, अशा प्राथमिकतेनुसार निधी खर्च केला जाईल.



दर तिमाहीला घेणार आढावा


केंद्र सरकार, जागतिक बँक, युनिसेफ, जिल्हा नियोजन समित्या तसेच सीएसआरच्या माध्यमातून राज्याला जलसंधारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र, राजकीय प्रभावामुळे अनेकदा पाणीटंचाई नसलेल्या भागांमध्ये हा निधी वळवला जात असल्याच्या तक्रारी होत्या. विदर्भ-मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाण्याचा संघर्ष टाळण्यासाठी आता हा निधी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. हा निधी नेमका कुठे व कसा खर्च झाला आणि त्यातून भूजल पातळीत किती सुधारणा झाली, याची पाहणी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी नियमित बैठक घेऊन कामांची प्रगती तपासणार आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल