
बीड : महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते आणि छळ केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात हाहाकार उडाला होता. तसेच देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. याचदरम्यान, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh HSC Result) हिने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

'या' तारखेआधीच करा अर्ज मुंबई : बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी (Bank Job) आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ऑफिस असिस्टंट पदांच्या भरतीसाठी ...
वैभवीला किती टक्के गुण?
नुकतेच दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (HSC Result) जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला (Vaibhavi Deshmukh) ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वैभवीने बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली होती. यामध्ये वैभवीला इंग्रजी विषयात ६३, मराठीत ८३, गणितामध्ये ९४, फिजिक्समध्ये ८३, केमेस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजी विषयात ९८ गुण मिळाले आहेत. तिला एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळाले आहेत. वैभवीच्या या यशाने संपूर्ण बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे.
माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत
वडिलांच्या आठवणी आणि न्यायासाठी लढण्याची जबाबदारी मनात घेऊन वैभवी आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झाली आहे. आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं तिने म्हटले होते. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.