India Pakistan Tension: पाकड्यांची रशियाकडे गयावया, भारताला समजावण्याची घातली गळ

नवी दिल्ली: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारतासोबत वाढता तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताने रशियाची मदत मागितली आहे.


रशियाची भारतासोबत विशेष धोरणात्मक भागीदारी आहे आणि त्याचे पाकिस्तानशीही खूप चांगले संबंध आहेत, त्यामुळे १९६६ च्या ताश्कंद कराराप्रमाणे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी पाकिस्तान रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा वापर करू इच्छित आहे.


ताश्कंदमध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील सशस्त्र संघर्ष संपवण्यास मदत केली होती.



भारत पाक तणाव कमी करण्यासाठी रशिया करणार मदत?


भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, रशियाने तणाव कमी करण्यासाठी मदतीची ऑफर दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांसोबतच्या चर्चेदरम्यान ही ऑफर दिली. रविवारी, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी लावरोव्हशी फोनवर चर्चा केली आणि मॉस्कोला प्रादेशिक घडामोडींबद्दल माहिती दिली. या चर्चेचा संदर्भ देत, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील तणावात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात आले. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम भागात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर राजकीय तोडगा काढण्यासाठी रशिया काम करण्यास तयार आहे, जर इस्लामाबाद आणि नवी दिल्ली यांच्याकडून परस्पर इच्छाशक्ती असेल तर यावर भर देण्यात येईल.'



रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एस जयशंकर यांच्याशी साधला संवाद 


इशाक दार यांच्याशी बोलण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी लावरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवर संवाद साधला होता, या संभाषणात, लावरोव्ह यांनी दोन्ही बाजूंना १९७२ च्या शिमला करार आणि १९९९ च्या लाहोर घोषणेच्या भावनेनुसार पहलगाम हल्ल्यानंतर तणाव कमी करण्याचे आवाहन केले.


२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर हल्ला केला. यादरम्यान, नि:शस्त्र पर्यटकांना त्यांची ओळख विचारून गोळ्या घालण्यात आल्या. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका स्थानिक काश्मिरी युवकाचा देखील समावेश आहे.  या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला, आणि त्यानंतरच भारत सारकारने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कारवाईचे रणशिंग फुंकलं आहे.

Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.