Ind vs Pak : मुहूर्त ठरला! ७ मे रोजी देशभरात... गृह मंत्रालयाचे आदेश

सर्व आपत्कालीन यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश


PM मोदींचा मेगाप्लॅन


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पापाचे घडे आता भरले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पूर्णपणे वाढला आहे. पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठीचं आता भारतानं चांगलीच कंबर कसली आहे. या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. राज्यांनी पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे.





मॉक ड्रीलमध्ये काय होणार?


गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी या गोष्टींवर सराव होणार आहे.




  •  हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे

  •  नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे

  • हल्ल्याच्या वेळी शहर/क्षेत्र ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे)

  • महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया

  •  हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव


नागरिकांना सहकार्याचं आवाहन


केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे ला देशभरात सिव्हिल डिफेन्सचं मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहे. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय आहे. एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सर्वसामान्य, विद्यार्थ्यांना संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मॉक ड्रिलमध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले आहे.



मॉक ड्रिलने धोका नाही


ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील फिरोजपूर छावणीत ४ मे रोजी ३० मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल पार पडला. रात्री ९ ते ९.३० या वेळेत लाईट बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीतील सज्जतेचा आढावा घेण्यात आला.



भारताचं पाकविरुद्धात मोठं पाऊल


पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण खात्याचे सचिव राजेश कुमार सिंह यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना भेटले होते. त्यामुळे संरक्षण खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईची मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एखादी महत्त्वाची घटना घडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



पहलगामच्या हल्ल्यात २६ निष्पापांचा बळी


पहलगामच्या हल्ल्यात २६ निष्पापांचा बळी गेलाय. या हल्ल्याचं उत्तर आजवरचं सर्वात मोठं उत्तर असेल हे भारताने स्पष्ट केलंय. तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत पाकमध्ये शाब्दिक आणि राजकीय वॉर रंगलंय. आजवरच्य़ा कारवायांमधून भारताने पाकचे दात नेहमीच घशात घातलेत त्यामुळे आत्ता देशवासीय वाट पहात आहे पुढच्या स्ट्राईकची, पाकीस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याची... त्याची भारतीय सैन्य ज्या प्रकारे तयारी करीत आहे त्यावरून नक्कीच काही तरी मोठं होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.