पद्मश्री विजेत्या योगगुरू स्वामी शिवानंद यांचे वाराणसी येथे १२९ व्या वर्षी निधन

वाराणसी : प्रसिद्ध योगगुरू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते स्वामी शिवानंद सरस्वती यांचे रविवार ४ मे रोजी १२९ व्या वर्षी निधन झाले. ते तपस्वी जीवनशैली आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी तसेच योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध होते. पंतप्रधान मोदींसह सार्वजनिक जीवनातील अनेक दिग्गजांनी, शिवानंद सरस्वती यांच्या शिष्यांनी आणि स्थानिकांनी दिवंगत स्वामी शिवानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली.



स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग क्षेत्रात अतुलनीय कार्य केले शिवाय वंचितांसाठी आयुष्य वेचले. योग आणि मानवतावादी कार्यातील योगदानासाठी २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौविण्यात आले होते. स्वामी शिवानंद त्यांच्या साधेपणा, शिस्त आणि भक्तीसाठी ओळखले जात. आयुष्यभर त्यांनी स्वतःची कामं स्वतःचं करणं पसंत केलं. ते १२९ व्या वर्षीही योगासने करत होते.

स्वामी शिवानंद बाबा १२९ वर्षे जगले. आम्ही १९९८ पासून त्यांना भेटत होतो. ते एक महान आत्मा होते जे सर्वांना समानतेने वागवत होते. १२९ व्या वर्षी त्यांनी असे योग केले जे आमच्या वयाचे लोकही करू शकत नाहीत; असे धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले. टिंकू हे स्वामी शिवानंद सरस्वती यांचे शिष्य आणि मागील अनेक दशकांपासूनचे स्वामींचे शेजारी आहेत. स्वामीजी भेदभाव न करता सर्वांना अभिवादन करायचे. ते कधीही कोणावर अवलंबून नव्हते. साधे, स्वावलंबी आणि शिस्तीचे जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला, असेही धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले.

स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग साधना केली. तसेच गरीब, कुष्ठरोगी, वंचित यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले; असे स्वामींचे अनुयायी परिमल मुखर्जी म्हणाले.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी