आसाम : पाकिस्तान समर्थक ३७ देशद्रोह्यांना अटक

दिसपूर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ हिंदूंच्या ‘टार्गेट किलींग’नंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आसाममध्ये पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ३७ देशद्रोहींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर (एक्स) याबाबत माहिती दिली.


मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण ३७ देशद्रोहींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सर्व देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर काही लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा देणारी विधाने करत होते.

या विधानांना गांभीर्याने घेत, आसाम पोलिसांनी तपास सुरू केला आणि आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून ३७ जणांना अटक केली आहे. आसाम सरकार कोणतेही देशविरोधी वर्तन सहन करणार नाही. देशाच्या एकता आणि अखंडतेशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कुणीही देशविरोधी टिप्पणी किंवा कृती केल्याचे आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. राज्यात शांतता आणि सुरक्षा राखली जावी आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी विचारांना प्रोत्साहन दिले जाऊ नये, असा सरकारचा हेतू असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.

Comments
Add Comment

तुम्ही UPI वापरता का? तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची माहिती...

मुंबई : भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठा बदल घडवणारी घोषणा समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला मदत करणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अटकेत

श्रीनगर, जम्मू-काश्मीर: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात

आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या आणि भाजप कार्यालय पेटवले

लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आज, बुधवारी लेह शहरामध्ये झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण

आली दिवाळी! रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा!

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या

National Film Award : सूटबूट, पांढरे केस अन् गॉगल! राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुखचा स्टायलिश अंदाज

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात आज (मंगळवार, २३ सप्टेंबर) ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या

दिवाळी, छठ उत्सवासाठी रेल्वेची तयारी; १२ हजार विशेष गाड्या चालवणार

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात प्रवासाचा अनुभव सुलभ करण्यासाठी, रेल्वेने दिवाळी आणि छठ दरम्यान प्रवाशांची