Jammu Kashmir Accident : लष्कराचा ट्रक ७०० फूट खोल दरीत कोसळला! ३ जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) रामबन जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी चष्मा येथे लष्कराची गाडी घसरुन थेट ७०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात (Jammu Kashmir Accident) घडला. या घटनेत तीन सैनिकांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर लगेच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच पोलिसांनी या घटनेची एफआयआर दाखल केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.४) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून २०० ते ३०० मीटर दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. अपघअताची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्र मिळून बचाव कार्य सुरु केले. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असून ट्रकमधील उपस्थित असलेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजित कुमार आणि मान बहादूर असे तिन्ही जवानांचे नाव असून या तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला.



अपघाताचे कारण काय?


गेल्या काही दिवसांपासून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामसू-रामबन भागात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. महामार्गाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी परत सुरू करण्यात आला आहे. तरीही, ४० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रामबन-रामसू पट्टा अजूनही धोकादायक आहे. हा जवळपास ३०० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा एक कमजोर भाग आहे.



यापूर्वीही घडला होता अपघात


जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील एसके पायीन भागात सहा जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता आणि दोन गंभीर जखमी झाले होते. (Jammu Kashmir Accident)

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा