महत्वाची माहिती! पाकिस्तानच्या २ गुप्तहेरांना अमृतसरमधून अटक, भारतीय सैन्याच्या हालचालींवर ठेवून होते लक्ष

अमृतसरमधून ISI च्या दोन गुप्तहेरांना अटक. गोपनीय माहिती केली लिक!


अमृतसर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानसोबत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना पकडण्यात आले आहे. हे गुप्तहेर (Pakistani Spies) भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेस संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवत होते.


अमृतसरमधील बल्हाडवाल येथे राहत असलेला पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांना अजनाला पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आयएसआयला माहिती देण्याच्या बदल्यात, पाकिस्तान गुप्तचर संघटना या दोघांच्या बँक खात्यात पैसे जमा करत असे. त्यामुळे या दोघांविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट, बीएनएस कलम ६१(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सैन्याच्या हालचालींवर ठेवून होते लक्ष


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करत होते आणि अमृतसरमधील सैन्याच्या हालचाली आणि  एअरबेसशी संबंधित माहिती मोबाईलवरील फोटो आणि व्हिडिओद्वारे पाकिस्तानला पाठवत होते. यासाठी त्यांना सिम कार्ड आणि फोन देण्यात आला होता. त्यांच्या इतर संपर्कांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांनी आयएसआयला कोणती माहिती शेअर केली आहे हे शोधण्यासाठी पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.



अमृतसर पोलिसांकडून सखोल तपास


या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे अमृतसर पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता? याचा तपास केला जात आहे. या कृत्यात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. या आयएसआय एजंट्सकडून आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसबद्दल माहिती असलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. तसेच काही छायाचित्रे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.


दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातून व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. तर आयात-निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.