Dombivli : डोंबिवली रेल्वे स्थानकातील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला प्रारंभ

  110

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्र .३ आणि ४ वरील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम रखडल्याने फलाटावरील प्रवाशांना वळसा घेऊन जिन्यावर जावे लागत होते. तसेच या कामामुळे फलाटाचा भाग अरूंद झाला होता.


फलाटावर वावर करणे प्रवाशांना मुश्किल झाले होते. डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे स्थानकावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ ते ५ क्रमांकाला जोडणारा पादचारी पूल फलाटाच्या मध्यभागी सुरू केला. या सुविधा सुरू असताना डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्र. ३ आणि ४ वर कल्याण बाजूकडे मागील सहा महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या भागात प्रवाशांना उतरण्यासाठी असलेला जिना तोडून टाकला.



त्या जागी सरकत्या जिन्याच्या कामासाठी खड्डा आणि फलाटावर त्या कामाच्या ठिकाणी चारही बाजुने संरक्षित पत्रे लावले होते. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी रेल्वे प्रवाशांना अपेक्षा होती. फलाट क्रमांक ३ आणि ४ वर कल्याण दिशेने उतरण्यासाठी जिना नसल्याने प्रवाशांना दक्षिण बाजूच्या जिन्याने जाऊन पुन्हा माघारी येऊन फलाटावर कल्याण दिशेकडे जावे लागत होते.


हा वळसा घेताना प्रवाशांची दमछाक होत होती. फलाट क्र.३ आणि ४ वर मुंबईला जाणाऱ्या आणि कर्जत, कसारा, अंबरनाथ, खोपोलीकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. या दोन्ही बाजूकडील लोकल एकावेळी फलाटावर आल्या की कल्याण बाजूकडील भागात गर्दी होत होती. प्रवाशांमध्ये रेटारेटी होत होती.कल्याण दिशेने उतरलेला प्रवासी फलाटावर दक्षिण दिशेने चालत जाऊन तेथून जिन्यावर
जात होता.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात