कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून केली हत्या

  150

मंगळुरू : कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यापासून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरूत तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीचा अंदाज येताच कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळुरूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


सुहास शेट्टीची हत्या झाल्यानंतर उल्लालमधील फैझल, कोंचाडीमधील मोहम्मद लुकमान आणि कन्नूरच्या इरशादवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मंगळुरूचे पोलीस तपास करत आहेत.


सुहास शेट्टी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुरुवारी रात्री उडुपी तालुक्यातील अथराडी येथे एका मुसलमान तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी चालक अबू बक्करच्या ऑटोरिक्षाचा रस्ता अडवला. नंतर हल्लेखोरांनी तलवारी आणि बाटल्यांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अबू बक्कर पळून गेला आणि हिरियाडका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिरियाडका पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. आरोपी सुशांत आणि संदेश पुजारी यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एनआयएकडे सोपवावे अशी मागणी होत आहे.


सुहास शेट्टीच्या हत्येनंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. यामुळे मंगळुरूत तणाव आहे. पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये