Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिलचा हप्ता!

मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती


मुंबई : महायुती (Mahayuti) सरकारच्या लाडक्या बहिणी (Ladki Bahhin Yojana) आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी अक्षय्य तृतीयेच्या औचित्यावर बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, असे जाहीर केले होते. मात्र एप्रिल महिला सरला असून अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यासंदर्भात अदिती तटकरेंनी आता नवी माहिती दिली आहे.



'येत्या २ ते ३ दिवसांत खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.' मंत्री अदिती तटकरेंनी एक्स हँडलवर ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल'.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिनाअखेरीस २५ तारखेपर्यंत पैसे मिळतात. एप्रिल महिन्यात मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांना या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र एप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आहे.


यातच अदिती तटकरेंनी लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी २ कोटी ४७ लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार