पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कायमस्वरूपी बंद होण्याच्या उंबरठ्यावर? कारण काय?

कराची : भारताच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव चिघळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने ३० एप्रिलपासून पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) या आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीला आणखी अडचणीत टाकलं आहे.







PIA समोरील संकट गंभीर


पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले आकाशमार्ग बंद केले होते. त्याचाच प्रतिउत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानसाठी हे पाऊल उचललं. या निर्णयामुळे PIA ला अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरिता लांबचा मार्ग निवडावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी, इंधन खर्च आणि एकूणच ऑपरेशनचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.




PIA ची क्वालालंपूर, सोल, ढाका, हनोई आणि बँकॉकसारख्या ठिकाणी जाणारी विमानं यापूर्वी भारताच्या हवाई क्षेत्रातून जात होती. आता त्यांना चीन, लाओस, थायलंडमार्गे लांबचा वळसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकेकाळच्या प्रतिष्ठित PIA ची उड्डाणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.







उत्तर भागातली उड्डाणेही बंद


३० एप्रिल रोजी PIA ने गिलगिट, स्कार्दू आणि इतर उत्तर भागातील उड्डाणेही तात्पुरत्या स्वरूपात थांबवली आहेत. या भागात रस्तेमार्ग नीट विकसित नसल्याने लोक हवाई सेवांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रवाशांसोबतच मालवाहतूकही ठप्प झाली आहे. PIA कडून यासाठी कोणतंही अधिकृत कारण दिलं गेलेलं नाही, पण आर्थिक अडचणींमुळेच ही सेवा थांबवावी लागल्याचं समजतं.







खाजगीकरणाचा अयशस्वी प्रयत्न


PIA ला वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून खाजगीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या पहिल्या बोलीत अपेक्षित किंमत मिळाली नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न करूनही तो अयशस्वी ठरला. सरकारने गुंतवणूकदारांना १००% मालकी व पूर्ण नियंत्रण देण्याचं आश्वासन दिलं होतं, तरीही विश्वासाचा अभाव आणि वाढते भू-राजकीय धोके यामुळे कोणीच पुढे आलं नाही.







भारताच्या बंदीचा थेट परिणाम


PIA च्या एकूण ३०८ आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी बहुतांश पश्चिम आशियात जात असले तरी आग्नेय आशियाच्या मार्गांवर बंदीचा थेट परिणाम झाला आहे. एकेकाळी आशियातील आघाडीची विमान कंपनी म्हणून ओळख असलेली PIA आता टिकवण्यासाठी धडपड करतेय. भारतीय हवाई क्षेत्र बंद झाल्याने ती आणखी अडचणीत सापडली आहे.







PIA चं भविष्य काय?


PIA ची वर्तमान आर्थिक परिस्थिती, सरकारच्या खाजगीकरणातील अपयश आणि भारताने लावलेली हवाई बंदी – या सगळ्यामुळे कंपनीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. जर ही स्थिती कायम राहिली, तर भविष्यात PIA ला कायमस्वरूपी बंद करावं लागू शकतं, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.






थोडक्यात, भारताने घेतलेला हा राजकीय आणि रणनीतिक निर्णय केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पाकिस्तानच्या विमान वाहतूक क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

Iran - America War : इराण-अमेरिका कराराबाबत चर्चांना वेग,अटींबाबत अनिश्चितता कायम !

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी पुष्टी केली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध

Elon Musk Trillionaire : एलन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनेअर; संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलरवर

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलन मस्क (Elon Musk) यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला

External Affairs Minister : अमेरिकेची दुटप्पी धोरणे आणि भारताचे ऊर्जा धोरण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट मांडली भूमिका

NEW DELHI : रशियाकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरून पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेला परराष्ट्र

Iran-US War Update : इराण-अमेरिका संघर्ष संपणार? ट्रम्प यांनी दिली होर्मुज सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट

अमेरिका : अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे (Conflict) जगभरात

Three Indian sailors killed : ओमाननजीक अमेरिकेने मालवाहू जहाजावर केलेल्या भीषण हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू

भारताकडून अमेरिकेच्या राजदूतांना समन्स नवी दिल्ली :  ओमानच्या खाडीत एका व्यावसायिक मालवाहू जहाजावर अमेरिकेने

Iran - America War : ट्रम्प यांची इराणला थेट युद्धाची धमकी! ‘आज रात्री मोठा हल्ला करू’; तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचाही दावा

पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता धोकादायक वळण