धर्मांतराचा धक्कादायक प्रकार! प्राध्यापकाची हिंदू विद्यार्थ्यांवर नमाज पठणाची जबरदस्ती

७ शिक्षकांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मुख्य आरोपीला अटक


रायपूर : छत्तीसगढ येथील विलासपूर जिल्ह्यात धर्मांतराचा (Religion convert) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिलासपूर जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कॅम्पदरम्यान हिंदू विद्यार्थ्यांवर नमाज पठण करण्याची जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला आहे. कॅम्पदरम्यान प्राध्यापकाकडून विद्यार्थ्यांवर धर्मांतराचा प्रकार सुरु असून विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत प्राध्यपकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ७ शिक्षकांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत कोटा पोलिस स्टेशन हद्दीतील शिवराय गावातील शिबिरात १५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४ विद्यार्थी मुस्लिम होते; परंतु विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले. विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि तक्रार दाखल केली. दिलीप झाल असे प्राध्यापकाचे नाव असून बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला आज अटक करण्यात आली. त्याचबरोबर सहा प्राध्यापकांसह एका विद्यार्थ्यावर भारतीय न्याय संहिता आणि छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत धर्माच्या आधारावर द्वेष पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी सांगितल्यानुसार, या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.



हिंदू संघटना आक्रमक


या घटनेप्रकरणी हिंदू संघटनांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांनी चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. शहर अधीक्षक (कोतवाली) अक्षय सबादरा यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात आली. समितीच्या अहवालाच्या आधारे झा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर लोकांविरुद्धही चौकशी सुरू असल्याचे चावला यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मान्सून २६ मे पर्यंत केरळमध्ये आणि ६ जून पर्यंत कोकणात ?

नवी दिल्ली : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)

नीट परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित चाचणी (सीबीटी)पद्धतीने होणार

नवी दिल्ली : पुढील वर्षापासून नीट यूजी परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे, अशी माहिती

Bhojshala Verdict : धारमधील भोजशाळा हे सरस्वतीचेच मंदिर! हायकोर्टाने मशिदीचा दावा फेटाळला

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने (Indoor) शुक्रवारी एका अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट

PM Narendra Modi : यूएईच्या हवाई हद्दीत पंतप्रधान मोदींच्या विमानाला 'एफ-१६' ची सुरक्षा; एस्कॉर्टचा व्हिडिओ व्हायरल

अबू धाबी : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्याची सुरुवात अत्यंत

Dharmendra Pradhan on NEET : NEET विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: पुर्नपरीक्षेसाठी शुल्क नाही, जुनी फी परत मिळणार! : धर्मेंद प्रधान

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET-UG 2026 परीक्षेच्या

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची