RR vs MI, IPL 2025: राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्सचा विजय रथ रोखणार?

मुंबई(सुशील परब): आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्सची महत्त्वपूर्ण लढत होत आहे. राजस्थान रॉयल आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल. तसेच मागच्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा सहज पराभवही केला होता. गुजरातचे २०९ धावांचे आव्हानही त्यांनी १५.५ षटकात सहज पार केले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची ३८ चेंडूत १०१ धावांची झंजावती खेळी व त्याला यशस्वी जयस्वालची मिळालेली अप्रतिम साथ ४० चेंडूत ७० धावा या खेळीमुळे सहज विजय मिळवला.


मुंबई इंडियन्सने सलग पाच विजय मिळविले आहेत. मुंबई इंडियन्सचा फॉर्म पाहता राजस्थानला कडवी झुंज द्यावी लागेल. मुंबईच्या संघामध्ये जसप्रित बुमराह, ट्रेट बोल्टसारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांचा कस लागेल. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, हार्दिक पांड्या, हे फलंदाज फॉर्मात आहेत. त्यांची गोलंदाजी ही चांगली आहे.


राजस्थानसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या सलामीच्या फलंदाजांना आता सुर गवसलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई विरुद्ध ते एक आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतात. मुंबईसाठी चिंतेची बाब म्हणजे राजस्थानचा तेज गोलंदाज जोफ्रा आर्चर, त्याच्या सुरुवातीचा स्पेल खेळून काढणे मुंबईला कठीण जाईल. त्यामुळे अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहावयास मिळेल अशी अपेक्षा करुया. चला तर बघुया राजस्थान रॉयल मुंबई इंडियन्सचा विजय रथ रोखणार का?

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो