फोन चार्जिंगला लावून वापरत असाल मग ही बातमी वाचा

  69

अमरावती : मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळला नाही तर तो धोकादायक ठरू शकतो. जगभरात अचानक फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये, हे स्फोट प्राणघातक देखील ठरले आहेत. चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची घटनाअनेकदा घडली आहे. अशीच एक घटना अमरावती येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.


अमरावतीतील साईधामनगर येथील संजय टाले यांचा घरी ही घटना सकाळी ११ वाजता घडली. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज व आवाका एवढा मोठा होता की संपुर्ण घरात कंपन झाले होते. स्फोटाच्या आवाजाने संजय टाले यांची पत्नी हॉलमध्ये आल्या असता मोबाईला आग लागलेलीत्यांना दिसली तसेच बाजूच्या कपड्यांनीसुद्धा पेट घेतला होता. त्यांनी प्लगचे बटन स्वीचऑफ केले व मोबाईलवर पाणी टाकले. सतर्कतेने मोठी हानी टळली. त्यावेळी घराच्या बेडरूममध्ये सुदैवाने कोणी नव्हते. संजय टाले यांनी सांगीतले की, मोबाईलच्या स्फोटाचा आवाज खुप मोठा होता.


घर थोडक्यात बचावले. पत्नीने जर तात्काळ येऊन मोबाईलची आग विझवली नसती तर खूप मोठी हानी झाली असती.मोबाईल स्फोट कसा होतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. कुणीही चार्जिंगवर लावून मोबाईल पाहू नये व विशेष करून मोबाईल लहान मुलांना देऊ नये. नाहीतर खूप मोठी नुकसान होऊ शकते, असे संजय टाले यांनी सांगितले

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या