फोन चार्जिंगला लावून वापरत असाल मग ही बातमी वाचा

अमरावती : मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळला नाही तर तो धोकादायक ठरू शकतो. जगभरात अचानक फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये, हे स्फोट प्राणघातक देखील ठरले आहेत. चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची घटनाअनेकदा घडली आहे. अशीच एक घटना अमरावती येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.


अमरावतीतील साईधामनगर येथील संजय टाले यांचा घरी ही घटना सकाळी ११ वाजता घडली. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज व आवाका एवढा मोठा होता की संपुर्ण घरात कंपन झाले होते. स्फोटाच्या आवाजाने संजय टाले यांची पत्नी हॉलमध्ये आल्या असता मोबाईला आग लागलेलीत्यांना दिसली तसेच बाजूच्या कपड्यांनीसुद्धा पेट घेतला होता. त्यांनी प्लगचे बटन स्वीचऑफ केले व मोबाईलवर पाणी टाकले. सतर्कतेने मोठी हानी टळली. त्यावेळी घराच्या बेडरूममध्ये सुदैवाने कोणी नव्हते. संजय टाले यांनी सांगीतले की, मोबाईलच्या स्फोटाचा आवाज खुप मोठा होता.


घर थोडक्यात बचावले. पत्नीने जर तात्काळ येऊन मोबाईलची आग विझवली नसती तर खूप मोठी हानी झाली असती.मोबाईल स्फोट कसा होतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. कुणीही चार्जिंगवर लावून मोबाईल पाहू नये व विशेष करून मोबाईल लहान मुलांना देऊ नये. नाहीतर खूप मोठी नुकसान होऊ शकते, असे संजय टाले यांनी सांगितले

Comments
Add Comment

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील

Kolhapur Accident News: इनोव्हा-लॉरीची जोरदार धडक: दोघांचा जागीच मृत्यू DYSP वैष्णवी पाटील गंभीर...

कोल्हापूर : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) म्हणून कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या खासगी

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरात रविवारी मध्यरा‍त्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ

साताऱ्यात आनंदावर शोकाची छाया; लेकीच्या जन्मावेळीच सैनिक पित्याचा अपघाती मृत्यू

सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे.

CSMT स्टेशनवर विमानतळासारखी सुरक्षा; वाढत्या धमक्यांनंतर कडक निर्बंध,आता प्रवेश सहज नाही…

मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) मेल आणि एक्सप्रेस प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी अनिवार्य

कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची