असा IAS अधिकारी ज्याची ३४ वर्षांत ५७ वेळा झाली बदली

  70

नवी दिल्ली : भारतात जेव्हा आयएएस अधिकाऱ्याच्या बदलीची चर्चा होते तेव्हा हमखास आठवतात ते आयएएस अशोक खेमका. अशोक खेमका ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. तब्बल ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांची ५७ वेळा बदली झाली. यात अशा आठ वेळा आल्या जेव्हा ते एका ठिकाणी एक महिन्यापेक्षाही कमी काळ होते.

अशोक खेमका हे मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकात्याचे रहिवासी आहेत. ते हरियाणा कॅडरचे १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९६५ रोजी झाला. या नोंदीनुसार ३० एप्रिल २०२५ रोजी वयाची साठी पूर्ण झाल्यामुळे ते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी हरियाणा कॅडरमध्ये राहून ३४ वर्षे प्रशासकीय सेवा केली. या ३४ वर्षांच्या प्रवासात कळत नकळत कोणालाही दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, अशी एक्स पोस्ट अशोक खेमका यांनी केली आहे. निवृत्त झालेले अशोक खेमका वकिलीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत.

मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या अशोक खेमकांचे वडील शंकरलाल खेमका हे ज्युट मिलमध्ये कारकून होते. पण शंकरलाल यांचा मुलगा एकदम हुशार होता. अशोक खेमका यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले. त्यांनी पीएच.डी. देखील केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथून संगणक विज्ञानात पदवी पण घेतली. खेमका यांनी एमबीए देखील केले. नंतर त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले.

काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहाराचा करार रद्द केल्यामुळे २०१२ मध्ये अशोक खेमका एकदम चर्चेत आले. या निर्णयामुळे ते एकदम राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाले. एक प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्रामाणिकपणाची किंमत अशोक खेमका यांना मोजावी लागली. त्यांची ३४ वर्षांत ५७ वेळा बदली झाली. अनेक वेळा त्यांना कमी महत्त्वाच्या विभागात पाठवण्यात आले.

अशोक खेमकांनी २०१९ मध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात प्रशासन ही आता सेवा राहिलेली नाही व्यवसाय होत आहे असे नमूद करुन त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अखेर अशोक खेमका हरियाणाच्या वाहतूक विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत.
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )