असा IAS अधिकारी ज्याची ३४ वर्षांत ५७ वेळा झाली बदली

नवी दिल्ली : भारतात जेव्हा आयएएस अधिकाऱ्याच्या बदलीची चर्चा होते तेव्हा हमखास आठवतात ते आयएएस अशोक खेमका. अशोक खेमका ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. तब्बल ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांची ५७ वेळा बदली झाली. यात अशा आठ वेळा आल्या जेव्हा ते एका ठिकाणी एक महिन्यापेक्षाही कमी काळ होते.

अशोक खेमका हे मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकात्याचे रहिवासी आहेत. ते हरियाणा कॅडरचे १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९६५ रोजी झाला. या नोंदीनुसार ३० एप्रिल २०२५ रोजी वयाची साठी पूर्ण झाल्यामुळे ते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी हरियाणा कॅडरमध्ये राहून ३४ वर्षे प्रशासकीय सेवा केली. या ३४ वर्षांच्या प्रवासात कळत नकळत कोणालाही दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, अशी एक्स पोस्ट अशोक खेमका यांनी केली आहे. निवृत्त झालेले अशोक खेमका वकिलीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत.

मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या अशोक खेमकांचे वडील शंकरलाल खेमका हे ज्युट मिलमध्ये कारकून होते. पण शंकरलाल यांचा मुलगा एकदम हुशार होता. अशोक खेमका यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले. त्यांनी पीएच.डी. देखील केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथून संगणक विज्ञानात पदवी पण घेतली. खेमका यांनी एमबीए देखील केले. नंतर त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले.

काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहाराचा करार रद्द केल्यामुळे २०१२ मध्ये अशोक खेमका एकदम चर्चेत आले. या निर्णयामुळे ते एकदम राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाले. एक प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्रामाणिकपणाची किंमत अशोक खेमका यांना मोजावी लागली. त्यांची ३४ वर्षांत ५७ वेळा बदली झाली. अनेक वेळा त्यांना कमी महत्त्वाच्या विभागात पाठवण्यात आले.

अशोक खेमकांनी २०१९ मध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात प्रशासन ही आता सेवा राहिलेली नाही व्यवसाय होत आहे असे नमूद करुन त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अखेर अशोक खेमका हरियाणाच्या वाहतूक विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत.
Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ