असा IAS अधिकारी ज्याची ३४ वर्षांत ५७ वेळा झाली बदली

नवी दिल्ली : भारतात जेव्हा आयएएस अधिकाऱ्याच्या बदलीची चर्चा होते तेव्हा हमखास आठवतात ते आयएएस अशोक खेमका. अशोक खेमका ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. तब्बल ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांची ५७ वेळा बदली झाली. यात अशा आठ वेळा आल्या जेव्हा ते एका ठिकाणी एक महिन्यापेक्षाही कमी काळ होते.

अशोक खेमका हे मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकात्याचे रहिवासी आहेत. ते हरियाणा कॅडरचे १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९६५ रोजी झाला. या नोंदीनुसार ३० एप्रिल २०२५ रोजी वयाची साठी पूर्ण झाल्यामुळे ते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी हरियाणा कॅडरमध्ये राहून ३४ वर्षे प्रशासकीय सेवा केली. या ३४ वर्षांच्या प्रवासात कळत नकळत कोणालाही दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, अशी एक्स पोस्ट अशोक खेमका यांनी केली आहे. निवृत्त झालेले अशोक खेमका वकिलीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत.

मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या अशोक खेमकांचे वडील शंकरलाल खेमका हे ज्युट मिलमध्ये कारकून होते. पण शंकरलाल यांचा मुलगा एकदम हुशार होता. अशोक खेमका यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले. त्यांनी पीएच.डी. देखील केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथून संगणक विज्ञानात पदवी पण घेतली. खेमका यांनी एमबीए देखील केले. नंतर त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले.

काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहाराचा करार रद्द केल्यामुळे २०१२ मध्ये अशोक खेमका एकदम चर्चेत आले. या निर्णयामुळे ते एकदम राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाले. एक प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्रामाणिकपणाची किंमत अशोक खेमका यांना मोजावी लागली. त्यांची ३४ वर्षांत ५७ वेळा बदली झाली. अनेक वेळा त्यांना कमी महत्त्वाच्या विभागात पाठवण्यात आले.

अशोक खेमकांनी २०१९ मध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात प्रशासन ही आता सेवा राहिलेली नाही व्यवसाय होत आहे असे नमूद करुन त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अखेर अशोक खेमका हरियाणाच्या वाहतूक विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत.
Comments
Add Comment

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक