Eknath Shinde : काँग्रेसने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही; यामुळेच लाखो सैनिक शहीद झाले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात


मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला असून 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दिला आहे. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांसह अभिनेत्यांनी देखील प्रतिक्रीया मांडल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनीही पहलगाम हल्ल्याबाबत वक्तव्य करत असताना काँग्रेसवर घणाघात केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन केली जात आहे. मात्र, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Eknath Shinde On Pahalgam Attack)



पहलगाम हल्ल्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरुद्ध सर्वात कठोर कारवाई केली. अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन दिली. उच्चायुक्तालयातून ५ जणांना काढून टाकले. सिंधू जल करार स्थगित केला. अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, असे कधी घडले आहे का? पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कोणी केले? यावेळीही पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल.' सकाळी तिन्ही सैन्याच्या पथकांमध्ये बैठक झाली आणि त्यात कठोर निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करून हिशोब चुकता करतील.' असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


त्याचबरोबर, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. काँग्रेसने फक्त व्होट बँकचे राजकारण केले आहे. यामुळेच लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली