महापालिकेच्या वूलन मिल आयसीएसई शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

धारावीतील युवश्री सर्वाननला या विद्यार्थिनीने मिळवले ९३.०२ टक्के गुण


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सुरु करण्यात आलेल्य पहिल्या आयसीएसई मंडळाच्या शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला आहे. महापालिकेच्या माटुंगा पश्चिम येथील वुलनमिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये धारावीतील ९० फुट रोडवरील कामराज नगर परिसरात राहणाऱ्या युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.०२ टक्के गुण मिळवले आहे.


या वुलन मिल आयसीएसई मंडळाच्या शाळेतील २७ विद्यार्थ्यांपैंकी ७ विद्यार्थ्यांनी ८१ टक्क्यांहून अधिक गुण मिळववले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ३० एप्रिल २०२५ रोजी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०२०-२१ मध्ये जी-उत्तर विभागात मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल ही ‘आयसीएसई’ मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत आयसीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. सन २०२४-२५ मध्ये या शाळेत इयत्ता १० वी चा वर्ग होता. त्यामध्ये एकूण २७ विद्यार्थी इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी ८१ टक्के व त्याहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले. यामध्ये धारावीतील युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.०२ टक्के व अर्पित यादव या विद्यार्थ्याने ९१.०८ टकके गुण प्राप्त केले. मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल आयसीएसई मंडळाच्या शाळेचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला आहे.


यासर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती वखारिया, जी उत्तर विभागाच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (शाळा)स्नेहलता डुंबरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला