MHADA Lottery : मुंबईकरांचं घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा तर्फे लवकरच लॉटरी होणार जाहीर

मुंबई : मुंबईत घर व्हावं हि प्रत्येकाची इच्छा असते. घरांच्या वाढत्या किंमतीमुळे काहींची ही स्वप्ने अपूर्णच राहतात. सोयीसुविधांचे अमिष दाखवून वेगवेगळ्या बिल्डरने आजपर्यंत अनेकांना फसवल्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच जर तुम्हाला परवडेल अशा किंमतीत आणि मुंबईमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर म्हाडाने मुंबईकरांसाठी परवडेल अशा किंमतीत घरांची विक्री सुरु केली आहे.


म्हाडाकडून लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, या घरांसाठीच्या अटींमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. म्हाडाने माहुलमध्ये तब्बल ४७०० घरे बांधली आहेत. ही घरे महापालिकेचे कर्मचारी १२ लाख ६० हजार रुपयांत घेऊ शकतात. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसांठी घरांची विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्याला प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे प्रशासनाने अटींमध्ये काही बदल केले आहेत.


बदललेल्या अटींनुसार, आता श्रेणी १ मधील कर्मचारी वगळता सर्वच श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी या घरांसाठी अर्ज करू शकतात. मुख्य म्हणजे, अर्ज करण्याची मुदत देखील १५ मे पर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहुल परिसरात २२५ चौ. फुटांची ४ हजार ७०० घरे बांधली असून, १२ लाख ६० हजारात ही घरे विकली जाणार आहेत.


एमएमआरडीएने प्रकल्प बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी महापालिकेला सदनिका दिल्या होत्या. मात्र, अनेक घरे रिक्त राहिल्याने ती कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय म्हाडकडून घेण्यात आला. मुंबई महापालिका प्रशासन म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच लॉटरी पद्धतीनं स्वत:ची घरे देणार आहेत.

Comments
Add Comment

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक

प्रभादेवीतील साई सुंदरनगर, कामगारनगरमधील नाल्यांचे बांधकाम होणार

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर,