Milk Price Hike : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर 'मदर डेअरी' कंपनीच्या दुधाची दरवाढ!

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सण राज्यभरात साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीया नवीन सुरुवात, संपत्ती आणि समृद्धीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सुरू केलेली किंवा खरेदी केलेली कोणतीही गोष्ट चिरस्थायी यश मिळवून देते असे मानले जाते. मात्र याच अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर दूध खरेदीदारांना फटका बसत आहे. मदर डेअरी (Mother Dairy) कंपनीनं दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल बुधवार, ३० एप्रिल म्हणजेच आजपासून पासून लागू होणार आहे. दूध खरेदीचा खर्च वाढल्यानं हे पाऊल उचलावं लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. (Mother Dairy Milk Price Hike)



मदर डेअरीनं आज, बुधवारपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदीच्या खर्चात प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्यानं हा बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्याची सुरुवात आणि उष्णतेची लाट याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदीच्या दरात वाढ झाली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मदर डेअरीचे म्हणणं आहे.


शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला आधार देताना ग्राहकांना चांगल्या दर्जाचं दूध उपलब्ध देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा बदल वाढीव खर्चाचा केवळ अर्धा भाग आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित साधणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि उत्तराखंडच्या बाजारपेठांसाठी हे नवे दर ३० एप्रिल पासून लागू झाले.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक