Milk Price Hike : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर 'मदर डेअरी' कंपनीच्या दुधाची दरवाढ!

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सण राज्यभरात साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीया नवीन सुरुवात, संपत्ती आणि समृद्धीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सुरू केलेली किंवा खरेदी केलेली कोणतीही गोष्ट चिरस्थायी यश मिळवून देते असे मानले जाते. मात्र याच अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर दूध खरेदीदारांना फटका बसत आहे. मदर डेअरी (Mother Dairy) कंपनीनं दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल बुधवार, ३० एप्रिल म्हणजेच आजपासून पासून लागू होणार आहे. दूध खरेदीचा खर्च वाढल्यानं हे पाऊल उचलावं लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. (Mother Dairy Milk Price Hike)



मदर डेअरीनं आज, बुधवारपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदीच्या खर्चात प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्यानं हा बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्याची सुरुवात आणि उष्णतेची लाट याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदीच्या दरात वाढ झाली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मदर डेअरीचे म्हणणं आहे.


शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला आधार देताना ग्राहकांना चांगल्या दर्जाचं दूध उपलब्ध देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा बदल वाढीव खर्चाचा केवळ अर्धा भाग आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित साधणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि उत्तराखंडच्या बाजारपेठांसाठी हे नवे दर ३० एप्रिल पासून लागू झाले.

Comments
Add Comment

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा

राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन