येत्या पाच वर्षांत म्हाडा बांधणार आठ लाख घरे

म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक


मुंबई (प्रतिनिधी): मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर) २ लाख ४९ घरे मंजूर आहेत, त्यामध्ये पुढील पाच वर्षांत ५ लाख ३२ हजार ६५२ घरे बनवण्यात येतील. यामध्ये मुंबई बोर्ड, दुरुस्ती बोर्ड व कोकण बोर्डाचा समावेश आहे. मुंबई व एमएमआरडीए रिजनसाठी ग्रोथ हब व गृहनिर्माण धोरण बावत म्हाडाने सुचवलेल्या शिफारशींची यावेळी जयस्वाल मांनी माहिती दिली. पुढील पाच वर्षांत म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक होणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले. सोमवारी म्हाडाने आयोजित केलेल्या पुनर्विकास परिषद व गुंतवणूकदार मीटमध्ये ते बोलत होते.


पुनर्विकासासाठी तब्बल ३०, ३५ वर्षे लागणे अत्यंत चुकीचे आहे. पुनर्विकासाची कामे तातडीने व प्राधान्याने करावीत, तुम्हाला दुआ मिळेल, असा सल्ला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विकासकांना दिला. ३०, ३५ वर्षे पुनर्विकासासाठी लावू नका, अशी प्रकरणे पुढे आल्यानंतर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले. यावेळी एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, नितेंद्र मेहता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर, दुरुस्ती मंडळाचे मिलींद शंभरकर, माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, ज्येष्ठ विकासक निरंजन हिरानंदानी, धवल अजमेरा, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल नरेडकोचे बोमन इराणी व मोठ्या संख्येने विकासक, गुंतवणूदार उपस्थित होते.


मोतीलाल नगर गोरेगाव, वांद्रे रेक्लेमेशन, अभ्युदय नगर काळाचौकी, पोलीस हाऊसिंग, आदर्श नगर वरळी, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, सिद्धार्थनगर अशा ठिकाणी गुंतवणुकदार म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास केला जाईल, रेरेंटल हाऊसिंगसाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. भाडेतत्त्वावरील घरांमधून मिळणाऱ्या भाड्याचे उत्पन्न पुढील दहा वर्षांसाठी आयकर मुक्त असेल, अशी शिफारस करण्यात आली आहे. कर्जावरील व्याज दरात कपात, बाय बैंक धोरण अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या भाढतत्त्वावरील घरांसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करेल, मुंबई साठी अतिरिक्त ०.५ एफएसआय व एमएमआर रिजनसाठी ०.३ एफएसआय देण्यात मेईल. रेटलसाठी प्रीमियम माफ केला जाईल, डेव्हलपमेंट चार्च ५० टक्के माफ केला जाईल, प्रॉपर्टी टॅक्स ५०% केला जाईल, अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. निरंजन हिरानंदानी म्हणाले, मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग रेंटल हाऊसिंग नसल्याने बंगळूरु हैदराबादला जात आहेत हा रेंटल हाऊसिंग नसल्याचा परिणाम असल्याचे मत त्यांनी मांडले. रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Comments
Add Comment

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची

Pranit More - Sejal Pawar Controversy : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी MBBS ची विद्यार्थिनी सेजल पवार सक्तीच्या रजेवर, चौकशी सुरू - माहिती

मुंबई : स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे

Ashish Shelar : आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना मुंबई, पावसाळ्यात पूर परिस्थितीचे

Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर