Akshay Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयानिमित्त इस्कॉन मंदिरामध्ये आंब्याची आरास

नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या सणाच्या निमित्ताने आज बहुतांश मंदिरात फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची सजावट केली जाते. शहरातील इस्कॉन मंदिरामध्ये अक्षय तृतीया निमित्त आंब्याची आरास करण्यात आली तर यावेळी भगवंतांना चंदन लेप देखील लावण्यात आला. श्री राधा मदन गोपाल मंदिर (इस्कॉन) येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ३०० किलो आंब्यांचा विशेष आरास करण्यात आला. भगवंत सांगतात की, मला एखादे पान, फुल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. ह्याच भावनेतून भक्तांनी फळांचा राजा असणारा आंबा आपल्या आराध्य श्री मदन गोपाल यांना अर्पण केला.



विविध प्रकारच्या पानांचा, फुलांचा व तब्बल ३०० किलो आंब्यांचा वापर करून हा आरास करण्यात आला होता. या मध्ये प्रामुख्याने रत्नागिरी व देवगड हापूस, बदाम, केशर, लालबाग ह्या आंब्यांचा वापर करण्यात आला होता आणि सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व आंब्यांचे वाटप संध्याकाळी महाप्रसादाबरोबर भाविकांना करण्यात आले. दिवसभर नाशिककरांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या विशेष दर्शनासाठी दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पहायला मिळाली.

Comments
Add Comment

Flipkart–Uber Partnership : राईड्सवर मिळणार सुपरकॉइन्स, रिवॉर्ड इकोसिस्टमचा विस्तार

मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४