नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, २६ जखमी

वणी: रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच सप्तशृंगी मातेच्या वणीच्या गडावर नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटले.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात गाडीत बसलेले २६ भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे.


आज सकाळी छोटा हत्ती या मालवाहू गाडीतून परिवार व नातलग नवस फेडण्यासाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी निघाले होते. वळण रस्त्यावर चालकाचा अंदाज चुकला नांदुरी गड काही अंतरावर असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. वणी-नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर वळण रस्ता असून येथे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन सरळ जाऊन रस्त्याच्या खाली उतरून भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर उलटल्याने टेम्पोत असलेले २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी आहेत. यात काही जणांना अधिक मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.


अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी लागलीच मदत करत जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या