Central Railway News : मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो लक्ष द्या! सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंतच धावणार...

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज (दि ३०) मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दि ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक कल्याण – कर्जत विभागातील भिवपुरी रोड – कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी घेण्यात येणार आहे. मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परिणामी, रविवारपर्यंत रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लोकल फक्त बदलापूरपर्यंत धावणार आहे.


भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, होसपेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, सिकंदराबाद – राजकोट, कोयंम्बत्तूर – राजकोट, सिकंदराबाद ते पोरबंदर, काकिनाडा फोर्ट – भावनगर या रेल्वेगाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्या २०-३० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल. या रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त उशिरा धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, सुट्टी विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जातील. असे रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे.


दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री ००:१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही लोकल बदलापूर – कर्जतदरम्यान रद्द करण्यात येणार आहे. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री २:३० वाजता सुटणारी लोकल बदलापूर येथून चालवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना