Central Railway News : मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो लक्ष द्या! सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंतच धावणार...

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज (दि ३०) मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दि ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक कल्याण – कर्जत विभागातील भिवपुरी रोड – कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी घेण्यात येणार आहे. मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परिणामी, रविवारपर्यंत रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लोकल फक्त बदलापूरपर्यंत धावणार आहे.


भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, होसपेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, सिकंदराबाद – राजकोट, कोयंम्बत्तूर – राजकोट, सिकंदराबाद ते पोरबंदर, काकिनाडा फोर्ट – भावनगर या रेल्वेगाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्या २०-३० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल. या रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त उशिरा धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, सुट्टी विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जातील. असे रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे.


दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री ००:१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही लोकल बदलापूर – कर्जतदरम्यान रद्द करण्यात येणार आहे. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री २:३० वाजता सुटणारी लोकल बदलापूर येथून चालवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील