Central Railway News : मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो लक्ष द्या! सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंतच धावणार...

  148

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज (दि ३०) मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दि ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक कल्याण – कर्जत विभागातील भिवपुरी रोड – कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी घेण्यात येणार आहे. मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परिणामी, रविवारपर्यंत रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लोकल फक्त बदलापूरपर्यंत धावणार आहे.


भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, होसपेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, सिकंदराबाद – राजकोट, कोयंम्बत्तूर – राजकोट, सिकंदराबाद ते पोरबंदर, काकिनाडा फोर्ट – भावनगर या रेल्वेगाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्या २०-३० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल. या रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त उशिरा धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, सुट्टी विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जातील. असे रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे.


दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री ००:१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही लोकल बदलापूर – कर्जतदरम्यान रद्द करण्यात येणार आहे. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री २:३० वाजता सुटणारी लोकल बदलापूर येथून चालवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.