'कार्यस्थळी लैंगिक छळ होऊ नये, यासाठी सदैव दक्ष रहा'

चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे आवाहन


मुंबई (खास प्रतिनिधी) :सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्य करत आहेत आणि नावलौकिक मिळवत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. कार्यस्थळी लैंगिक छळ होऊ नये, यासाठी सदैव दक्ष राहायला हवे. ऐकू येणाऱ्या, दिसलेल्या आणि कळलेल्या गुन्ह्यांविरोधात आवाज उठवणे ही आपली फक्त जबाबदारी नसून कर्तव्य आहे, हे कायम लक्षात ठेवायला हवे, असेही कुलकर्णी म्हणाल्या. दरम्यान, याप्रसंगी महापालिका आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.


लैंगिक छळप्रकरणी समुपदेशन, विधी सेवा, सायबरविषयक मदत आदींच्या बाबतीत बालक आणि महिलांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ उपक्रम अंतर्गत महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी समर्पित ‘सायबर वेलनेस’ केंद्राचीही सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही केंद्रांचा शुभारंभ तसेच महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आदी क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते मंगळवारी २९ एप्रिल २०२५ रोजी गौरव करण्यात आला. परळ येथील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला.


मुंबई महानगरपालिकेच्या उपआयुक्त (विशेष) तथा सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती अध्यक्षा चंदा जाधव, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्यासह समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये तसेच त्यांना योग्यवेळी न्याय मिळावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेत महिलांच्या लैंगिक छळविरोधी तक्रारींसाठी समिती कार्यरत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिला लैंगिक छळासंदर्भात तयार केलेली विशाखा मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करणारी महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.


मुंबई महानगरपालिकेत सन १९९७ पासून कार्यरत या समितीअंतर्गत महिला लैंगिक छळविरोधी विविध जनजागृतीपर उपक्रम आदींचे आयोजन केले जाते. आजमितीस मुंबई महानगरपालिकेत एकूण ९२ समित्या कार्यरत आहेत. तसेच, मुख्य समितीच्या वतीने दरवर्षी सर्व समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. याच धर्तीवर, महानगरपालिकेने २००३ मध्ये लैंगिक छळमुक्त कार्यसंस्कृतीसाठी धोरण तयार केले आहे. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर या समिती कार्यरत आहेत. तसेच, या समितींच्या वतीने दरवर्षी रितसर प्रशिक्षणाचेही आयोजन केले जाते.


याच पार्श्वभूमीवर, लैंगिक छळप्रकरणी समुपदेशन, विधी सेवा, सायबरविषयक मदत आदींच्या बाबतीत बालक आणि महिलांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ उपक्रम अंतर्गत महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी समर्पित ‘सायबर वेलनेस’ केंद्राचीही सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राच्या वतीने शैक्षणिक संस्था, तळागाळातील समुदाय तसेच मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये सायबरसंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती केली जाईल. सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने गरजेनुरुप नि:शुल्क विधी सहाय्य, तांत्रिक मदत आणि समुपदेशनही केले जाईल, अशी माहिती समिती अध्यक्षा चंदा जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच