कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, ज्यांच्याकडे आहे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हाती घेणार आहेत. नॉर्दन आर्मी कमांड ही जम्मू काश्मीर आणि लडाख तसेच सियाचीन येथील सर्व लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवते. पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी याच कमांडकडून निर्देश दिले जातात. या कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा सूत्र हाती घेणार आहेत.



शर्मा यांच्या नावाचा विचार नॉर्दन आर्मी कमांडचे प्रमुख म्हणून वरिष्ठ पातळीवर काही दिवसांपासून सुरू होता. अखेर जबाबदारी सोपवण्याचा औपचारिक निर्णय २८ एप्रिल रोजी घेण्यात आला. याआधी पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरला पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता.



कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा ?

लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे भारतीय सैन्यातील एक अनुभवी अधिकारी आहेत. ते मागील तीन दशकांपेक्षा जास्त काळ लष्करात आहेत. श्रीलंकेतील भारताच्या शांतीसेनेचे ऑपरेशन पवन, सियाचीन ग्लेशियर येथील ऑपरेशन मेघदूत, काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात राबवलेले ऑपरेशन रक्षक, संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेले सीमेवरील नियुक्तीबाबतचे ऑपरेशन पराक्रम अशा अनेक आव्हानात्मक ऑपरेशन्समध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

नॉर्दन आर्मी कमांडकडे असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

नॉर्दन आर्मी कमांड पाकिस्तानसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर आणि चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवते. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नॉर्दन आर्मी कमांडच्या कामाचा ताण वाढला आहे.

प्रतीक शर्मा यांची कामगिरी

प्रतीक शर्मा यांनी यापूर्वी लष्करी मुख्यालय, नवी दिल्ली येथे नव्याने स्थापन झालेल्या माहिती संचालनालयात डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ), मिलिटरी सेक्रेटरी ब्रँच आणि अलिकडेच डायरेक्टर जनरल इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणून वरिष्ठ पदांवर काम केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच ते लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरला पोहोचले होते. यातूनच्या त्यांच्या धोरणात्मक विचारसरणीचा आणि तयारीचा अंदाज येतो.
Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३