Maharashtra Weather : पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्यभरात वादळी वाऱ्यासह कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी

  143

पुणे : यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मागील आठवडाभर विदर्भात तापमानाने नवनवे उच्चांक गाठले. तापमानात (Maharashtra Weather) मोठी वाढ झाल्याने विदर्भासह संपूर्ण राज्यभर तीव्र उन्हाच्या झळा (Heat Wave) सोसाव्या लागल्या. परंतु आता उष्णतेच्या लाटेची डोकेदुखी सहन केल्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हजेरीला तोंड द्यावे लागणार (Unseasonal Rain) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.



गेल्या आठवडय़ात कित्येक ठिकाणी तापमानाचा पारा ४५-४६ अंशांवर गेला होता. त्यानंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. अवकाळीचे ढग दाटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, असे भाकीत हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात घट होईल आणि राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडेल, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.



कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता?


सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Maharshtra Unseasonal Rain)



तीन महिन्यांत जगभर तापमानवाढ तीव्र होणार


राज्यासह देशभरात उष्णता भयंकर वाढली आहे. याचदरम्यान जागतिक हवामानशास्त्र संघटनेने नव्या धोक्याची घंटा वाजवली आहे. पुढील तीन महिन्यांत जगभरात तापमानवाढ अधिक तीव्र होईल. उत्तर दक्षिण प्रशांत, पूर्व आशिया आणि अरब या भागात उष्णता उच्चांक गाठेल, असा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवला आहे. मे ते जुलैदरम्यान जगातील बहुतांश भागात पारा वाढू शकतो, असे हवामानशास्त्र संघटनेने म्हटले आहे.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या