'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला हजेरी लावणाऱ्यांनी याच दुकानांतून खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे. सिंहस्थ कुंभमेळ्यात जर कोणी मुसलमान दुकान लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुकान उखडून टाका असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिली. ते नाशिकमध्ये हिंदू हित रक्षातर्फे आयोजित नित्य गरजांना आवश्यक अशा शेकडो हिंदू कारागीर व लघु व्यावसायिकांच्या यादीचे प्रकाशन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी नितेश राणे ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ या विषयावर बोलले. हिंदू व्यक्तीने त्याच्या गरजेच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करताना हिंदू व्यवसायिकालाच प्राधान्य द्यावे, असे भाजप नेते नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी मंचावर कामाख्या देवीचे कालीचरण महाराज, आमदार सीमा हिरे, हिंदू हित रक्षाचे प्रवीण जोशी उपस्थित होते.



भारतात हिंदूंच्या बाजूने आणि हिंदूंच्या हितासाठी बोलायचे नाही तर काय पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये जाऊन बोलायचे ? असा प्रश्न भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांना 'गजवा - ए - हिंद'च्या माध्यमातून २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण सतर्क आणि जागरूक राहायला पाहिजे. कुणाच्याही जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रावर हिंदू असे लिहिलेले असते, त्यावर मंत्री किंवा आमदार असे लिहिलेले नसते. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदूंसाठी उभा आहे. आज जर आपण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडून देण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही हिंदुत्ववादी सरकार निवडून दिले. त्यावेळी आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कायदे करण्याचे काम सुरू आहे. आम्ही आमदार व मंत्री फक्त हिंदूंमुळे बसलो आहोत त्यांनी आम्हाला मत दिले नाही आणि आम्ही त्यांच्याकडे मत मागायला देखील गेलो नाही. सध्या माझ्याकडे मत्स्य व बंदरे खाते आहे. यापूर्वी हिंदूंच्या नावाने धरणांवर ठेके असायचे मात्र तो चालवणारा मुसलमान असायचा. आता ते चालणार नाही; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंखनाद आणि ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, नगरसेविका उषा बेंडकुळे, नगरसेवक नितीन निगळ, सुरेश पाटील, वंदना पाटील, रामसिंग बावरी, बबलू परदेशी आदी उपस्थित होते.



सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे, जो दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. यंदा नाशिक जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळा सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. नियोजनानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर, रामकुंड आणि पंचवटी येथे पारंपरिक ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे. यंदाच्या सिंहस्थात २ ऑगस्ट २०२७, ३१ ऑगस्ट २०२७ आणि ११ तसेच १२ सप्टेंबर २०२७ रोजी शाही स्नान होणार आहे. महायुती सरकारने नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. रस्ते विकास, गोदावरी नदीचे शुद्धीकरण, नवीन घाटांचे बांधकाम आणि रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. सिंहस्थ कुंभमेळा पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या पवित्र ठिकाणी होणार आहे.


सिंहस्थ म्हणजे काय ? : जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतो, म्हणूनच याला सिंहस्थ किंवा सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. हा एकमेव कुंभमेळा आहे जो एकाच (नाशिक जिल्हा) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि शैव आखाड्यांसाठी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या पवित्र ठिकाणी शाही स्नान तसेच इतर अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक