'पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार'

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या गरजांवरही लक्ष केंद्रित करेल. जगदाळे कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी दिली जाई; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. यात डोंबिवलीच्या तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका नागरिकाचा समावेश होता. या सहा जणांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.



मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर राज्यातील सहा मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.



पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्रातील सहा जण

  1. अतुल मोने, डोंबिवली

  2. संजय लेले, डोंबिवली

  3. हेमंत जोशी, डोंबिवली

  4. संतोष जगदाळे, पुणे

  5. कौस्तुभ गणबोटे, पुणे

  6. दिलीप देसले, पनवेल

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर