Breaking News : आंधळं प्रेम की जाळं? अहिल्यानगरमधून १३६ मुली अचानक बेपत्ता का?

अहिल्यानगर : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचं आंधळ्या प्रेमाला सोशल मीडियामुळे आणखी बळ मिळते. तरुणाई या आंधळ्या प्रेमामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेताना दिसते. फेब्रुवारी ते मार्च असा महाविद्यालयीन, शाळांचा परीक्षेचा काळ असतो. याच काळात अहिल्यानगर येथील १३६ मुली बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.



अहिल्यानगर मध्ये मुली बेपत्ता असल्याचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी प्रेमसंबंध हे प्रमुख कारण आहे. मात्र, अशाच काही घटनांमधून अघटित घटना घडल्याची उदाहरणे समोर आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांचा आढावा घेतला तर तीन महिन्यांत सर्वाधिक मुली पळून गेल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षेचा काळ असतो. याच काळात नेमक्या मुली पळून गेल्या आहेत.


एका सर्वेक्षणामध्ये शाळकरी वयामध्ये एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे आणि त्यातून मुलांच्या आमिषाला बळी पडून मुली पळून जाणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून परराज्यातील एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे, प्रेमाच्या आणाभाका घेणे, नंतर घरातून निघून जाणे असे साधारणपणे घडताना दिसते. कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती ही कारणेदेखील त्यात समोर आली आहेत. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातून १३६ मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ७१ मुली सापडल्या आहेत. अन्य बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेने नगर हादरले आहे.

Comments
Add Comment

Latur NCP News : महीन्या अगोदर निवडणुक जिंकली, अन् तातडीने उपचार न मिळाल्याने नगरसेविकेचा मृत्यु

लातूर :लातूर जिल्ह्यात मन हलवणारी गोष्ट घडली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून एक घटना समोर आली आहे. नुकतीच

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन