पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांना ठार केले. ज्या पहलगामला अनेक पर्यटन कंपन्या मिनी स्विर्त्झलंड म्हणतात त्याच ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन अनेकांना ठार करण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी घडली.





पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे व्हिडीओ हळू हळू येऊ लागले आहेत. आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन नवे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यातील एका व्हिडीओत अतिरेक्यांच्या गोळीबारामुळे पर्यटक जमिनीवर कोसळताना दिसत आहेत. दुसरा व्हिडीओ जेमतेम २९ सेकंदांचा आहे. या व्हिडीओत अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्याचे आवाज ऐकू येतात. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच घटनास्थळी असलेल्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळायला आणि सुरक्षित जागा गाठायला सुरुवात केली. या पळापळीवेळी एका व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओत नागरिकांची पळापळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे आधी जाहीर केले. नंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतला. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्याचे जाहीर केले. ही घोषणा झाल्यानंतर द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, असा नवा दावा करण्याचा प्रयत्न केला.
Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन