पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांना ठार केले. ज्या पहलगामला अनेक पर्यटन कंपन्या मिनी स्विर्त्झलंड म्हणतात त्याच ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन अनेकांना ठार करण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी घडली.





पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे व्हिडीओ हळू हळू येऊ लागले आहेत. आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन नवे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यातील एका व्हिडीओत अतिरेक्यांच्या गोळीबारामुळे पर्यटक जमिनीवर कोसळताना दिसत आहेत. दुसरा व्हिडीओ जेमतेम २९ सेकंदांचा आहे. या व्हिडीओत अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्याचे आवाज ऐकू येतात. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच घटनास्थळी असलेल्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळायला आणि सुरक्षित जागा गाठायला सुरुवात केली. या पळापळीवेळी एका व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओत नागरिकांची पळापळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे आधी जाहीर केले. नंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतला. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्याचे जाहीर केले. ही घोषणा झाल्यानंतर द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, असा नवा दावा करण्याचा प्रयत्न केला.
Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या