जात पात बाजूला ठेऊन मेहनत करून आपली उन्नती करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला


मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, जो या स्पर्धेत टिकेल तोच जगेल. त्यामुळे आपल्याला या स्पर्धेत टिकायचे असेल तर जात पात बाजूला ठेवा कठोर मेहनत करा. शिक्षण घ्या व नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा व आपल्याचा बांधवासाठी नोकऱ्या निर्माण करा, असा मौलिक सल्ला भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिला.

गाबीत समाजाच्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने खासदार नारायण राणे भांडुप येथे प्रमुख पाहुणे म्हणून रविवारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

मी कोकणातील गरिबी पाहिली आहे, गरिबी अनुभवली आहे. १९९० साली बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवले. तेव्हाच निर्धार होता की, कोकणवासीयांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. कोकणाचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशानेच मी कामाला लागलो. आज राजकारणात मी ११ पदे अनुभवली आहेत. खासदार, आमदार झालो, मुख्यमंत्रीही झालो. मात्र त्याचे बहुतांश श्रेय हे कोकणवासीयांना जाते असे सांगत नारायण राणे यांनी कोकणवासींयांचे आभार मानले.

आज महाराष्ट्रातील फक्त १२ टक्के मराठी समाज हा उद्योगधंद्यामध्ये आहे. मात्र गुजराती मारवाडी समाज हा मोठ्या प्रमाणात व्यवसायात आहे. त्यामुळे सर्वाधिक संपत्ती आज त्यांच्याकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत. आयटीआय आहे, मोठा समुद्र आहे, ताजे मासे आहेत. त्याचा लाभ घेऊन व्यवसाय वाढवा व कोकण समृद्ध करा. मेहनत करा, मुलांना शिक्षण द्या. संकुचित वृत्ती सोडा, दुसऱ्यांना प्रोत्साहन द्या असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.

स्नेहसंमेलनाचा उद्देश फक्त एकत्र येऊन गप्पा करणे व भोजन करणे एवढाच नसावा तर त्या स्नेहसंमेलनात आपले अनुभव दुसऱ्याला आदान प्रदान करून त्याचा समाजाच्या उन्नतीसाठी करता यावा याच्यासाठी करावा, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.

लवकरच सिंधुदुर्गात एक लाख रोजगार निर्माण होणार


सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे १ हजार ४०० एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून तेथे अदानी व जिंदाल यासारखे मोठ्या उद्योगपतींकडून साधारण ५०० कारखान्या संबंधी बोलणी लवकरच सुरू होणार असल्याचे सांगत नारायण राणे यांनी यामुळे सिंधुदुर्गात एक लाख रोजगार निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला.

गाबीत समाजाच्या भांडुप विभागाच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यी गुणगौरव समारंभ व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. हे स्नेहसंमेलन गाभीत समाज महाराष्ट्रचे अध्यक्ष सुजय घुरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार श्यामभाई सावंत, समाजाचे उपाध्यक्ष केटी तारी, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, बाळ मंचेकर व समाजाचे भांडुप अध्यक्ष वामन हडकर उपस्तिथ होते.
Comments
Add Comment

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड)