सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. सलग चौथ्या रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. पाकिस्तानला सलग चौथ्या रात्री भारताने चोख प्रत्युत्तर दिले.



संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, २७-२८ एप्रिलच्या रात्री कुपवाडा आणि पुंछ या दोन जिल्ह्यांना लक्ष्य करुन नियंत्रण रेषेच्या पलिकडून पाकिस्तानच्या लष्कराच्या चौक्यांनी लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे भारतात जीवितहानी झालेली नाही; असेही प्रवक्त्याने सांगितले.



पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन सुरक्षा पथकाने हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. ही कावाई सुरू असतानाच भारताने पाकिस्तान विरोधात इतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत. सार्क सवलतीत भारतात आलेल्यांचे व्हिसा पण रद्द करण्यात आले आहेत. फक्त हिंदू असलेल्या पाकिस्तानमधील नागरिकांना अपवाद म्हणून कागदपत्रे सादर करुन परवानगी घेऊन भारतात राहण्याची सवलत देण्यात आली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या ५५ वरुन ३० वर आणण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दलांच्या दुतावासातील प्रतिनिधींना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. जमिनीवरुन सुरू असलेला भारत - पाकिस्तान प्रवास बंद करण्यात आला आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी, त्यांचे मदतनीस आणि पडद्यामागचे सर्व सूत्रधार यांना शोधून कल्पनाही करता येणार नाही, अशी कठोर शिक्षा देऊ असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. ही घोषणा होताच अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने १९७२ चा सिमला करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे. भारतावर अणुबॉम्ब टाकू अशीही धमकी पाकिस्तानच्या काही नेत्यांनी दिली आहे. तर भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. पाकिस्तानसाठी अतिरेकी कारवाया करणाऱ्या काही जणांची घरं नष्ट करण्यात आली आहेत. यावेळी भारताने अतिरेकी, त्यांचे मदतनीस आणि पडद्यामागचे सूत्रधार या सर्वांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला आहे.
Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन