अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. अक्षय तृतीया चारच दिवस उरल्यामुळे बुधवारी (दि. ३०) आहे. यामुळे मार्केटयार्ड फळ बाजारात पणन मंडळ व वखार महामंडळ आधी भागात राज्य पणन महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचा थेट माल ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध केल्याने मार्केटयार्ड परिसरात आंबा खरेदीसाठी ग्राहकाकडून गर्दी होत आहे. बाजारात आंब्याची आवक ही वाढल्याने दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. बाजारात ४०० रुपयांपासून ते ८०० रुपये डझनापर्यंतचा आंबा उपलब्ध आहे.

५ ते ९ डझनाच्या पेटीला २५०० ते ४५०० रुपये, तर कच्चा मालाच्या पाच ते नऊ डझनाच्या पेटीला १५०० ते ३५०० दर मिळत आहे. डझनाचा दर ४०० ते ८०० रुपये आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात रोज चार ते पाच हजार पेटींची आवक होत आहे.

मागीलवर्षी याच काळात रोज ७ ते ७.५ हजार पेटींची आवक होत होती. एका डझनाचा दर २५० ते ६०० रुपये होता. चार ते आठ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीचा दर १००० ते २८०० रुपये होता.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन