अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त

Share

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. अक्षय तृतीया चारच दिवस उरल्यामुळे बुधवारी (दि. ३०) आहे. यामुळे मार्केटयार्ड फळ बाजारात पणन मंडळ व वखार महामंडळ आधी भागात राज्य पणन महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचा थेट माल ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध केल्याने मार्केटयार्ड परिसरात आंबा खरेदीसाठी ग्राहकाकडून गर्दी होत आहे. बाजारात आंब्याची आवक ही वाढल्याने दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. बाजारात ४०० रुपयांपासून ते ८०० रुपये डझनापर्यंतचा आंबा उपलब्ध आहे.

५ ते ९ डझनाच्या पेटीला २५०० ते ४५०० रुपये, तर कच्चा मालाच्या पाच ते नऊ डझनाच्या पेटीला १५०० ते ३५०० दर मिळत आहे. डझनाचा दर ४०० ते ८०० रुपये आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात रोज चार ते पाच हजार पेटींची आवक होत आहे.

मागीलवर्षी याच काळात रोज ७ ते ७.५ हजार पेटींची आवक होत होती. एका डझनाचा दर २५० ते ६०० रुपये होता. चार ते आठ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीचा दर १००० ते २८०० रुपये होता.

Recent Posts

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…

24 minutes ago

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…

30 minutes ago

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मच्छीमार बांधवांना किसान कार्डचे वाटप

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…

35 minutes ago

भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…

2 hours ago

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…

3 hours ago

पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…

3 hours ago