Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा 'बीबीसीला' इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे. हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून सरकारकडून दक्षता घेण्यात येत आहे.


सरकारने म्हणलं आहे की, बीबीसीसह सर्व विदेशी वाहिन्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना भारतात प्रसारण करण्याचा त्यांचा परवाना हा त्यांना दिलेला एक विशेषाधिकार आहे. मात्र हा अधिकार मिळाला असला तरी देखील देशातील नियम आणि कायदे पाळणे त्यांना बंधनकारक आहे. मात्र तरी देखील तुम्ही तुमचे पुर्वग्रह देशात पसरवत असाल तर तुम्हाला भारतात प्रसारण करण्याचा तुमचा अधिकार नाकारण्यात येऊ शकतो.



केंद्र सरकारकडून ६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे. कारण बीबीसीकडून पहलगाम दुर्घटनेनंतर प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये बीबीसीने भारतीयांचे व्हिसा पाकिस्ताने निलंबित केले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दहशतवाद्यांना दहशतवादी नाही तर उग्रवादी म्हटलं आहे. मात्र हे उग्रवादी नसून दहशतवादीच होते. जे पाकिस्तानमधून आल्याचं देखील सांगितलं जात आहे. देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यात बीबीसीने मात्र वेगळी भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.





दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण ६.३ कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू