वाल्मिक कराडला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि...

  49

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. न्यायालयीन आदेशानुसार तो कच्चा कैदी म्हणून सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. कारागृहातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडू लागल्याचे बघून कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराडला वैद्यकीय मदत दिली. डॉक्टरांनी तपासणी करुन वाल्मिक कराडला पॅनिक अॅटॅक आल्याचे सांगितले. तातडीने उपचार केल्यानंतर वाल्मिक कराडला निवडक वैद्यकीय तपासण्या करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या तपासण्यांच्या अहवालाआधारे डॉक्टर वाल्मिकवर पुढील उपचार करणार आहेत.



वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड आणि इतर सहा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीआयडीने कराड आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Comments
Add Comment

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या