वाल्मिक कराडला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि...

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. न्यायालयीन आदेशानुसार तो कच्चा कैदी म्हणून सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. कारागृहातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडू लागल्याचे बघून कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराडला वैद्यकीय मदत दिली. डॉक्टरांनी तपासणी करुन वाल्मिक कराडला पॅनिक अॅटॅक आल्याचे सांगितले. तातडीने उपचार केल्यानंतर वाल्मिक कराडला निवडक वैद्यकीय तपासण्या करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या तपासण्यांच्या अहवालाआधारे डॉक्टर वाल्मिकवर पुढील उपचार करणार आहेत.



वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड आणि इतर सहा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीआयडीने कराड आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात