वाल्मिक कराडला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि...

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. न्यायालयीन आदेशानुसार तो कच्चा कैदी म्हणून सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. कारागृहातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडू लागल्याचे बघून कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराडला वैद्यकीय मदत दिली. डॉक्टरांनी तपासणी करुन वाल्मिक कराडला पॅनिक अॅटॅक आल्याचे सांगितले. तातडीने उपचार केल्यानंतर वाल्मिक कराडला निवडक वैद्यकीय तपासण्या करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या तपासण्यांच्या अहवालाआधारे डॉक्टर वाल्मिकवर पुढील उपचार करणार आहेत.



वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड आणि इतर सहा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीआयडीने कराड आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना