दहशतवादाला कुठेही स्थान नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळेस त्यांनी या दुर्घटनेतील पिडीतांबाबत संवेदना व्यक्त केली.

दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला पहलगामच्या बैसारन खोऱ्यामध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवर लिहिले, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवरून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याच्या गोष्टीवर दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती व्यक्त केली.

इराणच्या समर्थनासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इराणच्या समर्थनासाठी आभार व्यक्त केले आहेत. तसेच क्षेत्रीय सहकार्य आणि एकता दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाईसाठी आवश्यक असल्याच्या मतावर नवी दिल्ली तसेच तेहरान यांनी सहमती दर्शवली.
Comments
Add Comment

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश