दहशतवादाला कुठेही स्थान नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळेस त्यांनी या दुर्घटनेतील पिडीतांबाबत संवेदना व्यक्त केली.

दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला पहलगामच्या बैसारन खोऱ्यामध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवर लिहिले, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवरून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याच्या गोष्टीवर दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती व्यक्त केली.

इराणच्या समर्थनासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इराणच्या समर्थनासाठी आभार व्यक्त केले आहेत. तसेच क्षेत्रीय सहकार्य आणि एकता दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाईसाठी आवश्यक असल्याच्या मतावर नवी दिल्ली तसेच तेहरान यांनी सहमती दर्शवली.
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे