दहशतवादाला कुठेही स्थान नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळेस त्यांनी या दुर्घटनेतील पिडीतांबाबत संवेदना व्यक्त केली.

दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला पहलगामच्या बैसारन खोऱ्यामध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवर लिहिले, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवरून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याच्या गोष्टीवर दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती व्यक्त केली.

इराणच्या समर्थनासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इराणच्या समर्थनासाठी आभार व्यक्त केले आहेत. तसेच क्षेत्रीय सहकार्य आणि एकता दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाईसाठी आवश्यक असल्याच्या मतावर नवी दिल्ली तसेच तेहरान यांनी सहमती दर्शवली.
Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन