Mohan Bhagwat: "आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे वळले तर..." जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

  94

मुंबई: अहिंसा हा भारताचा धर्म आहे, हिंदू धर्माचे ते मुख्य तत्व आहे, यावर भर देत संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी "भारत कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा इजा करत नाही, परंतु जर वाईट कृत्य वाढले तर बचावात प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. असे जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शनिवारी वक्तव्य केले. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्येक स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी देखील या हल्ल्याविरुद्ध जोरदार निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या द हिंदू मेनिफेस्टो नामक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित करताना हे वक्तव्य केले.



काय म्हंटले मोहन भागवत?


अहिंसा हे हिंदू धर्माचे मुख्य तत्व आहे, मात्र आक्रमकांना तोंड देणे आणि विजय मिळवणे हा देखील धर्माचा एक भाग आहे.  रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.


"आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना इजा पोहोचवत नाही. पण जर कोणी वाईटाकडे वळले तर दुसरा पर्याय काय आहे? प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, आणि त्याने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे," असं देखील भागवत पुढे म्हणाले.


भागवत यांनी आपल्या भाषणात चार तत्वांवर भर दिला आहे, ते म्हणाले "सनातन धर्माची खरी समज सध्याच्या काळात महत्त्वाची आहे. हिंदू धर्म सत्य, सुचितता, करुणा आणि तपस्या या चार स्तंभांवर उभा राहिला पाहिजे. याच्या पलीकडे जाणारी प्रत्येक गोष्ट अधर्म आहे,"



हिंदू शांत बसणाऱ्यातले नाही


दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की हल्लेखोरांनी लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीचा भाग नाही. पण शांतपणे हानी सहन करणेही आपला स्वभाव नाही.


पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने या दहशतवादी हल्ल्याचा दावा केला आहे आणि अलिकडच्या काळातल्या सर्वात प्राणघातक घटनांपैकी एक म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं