Mohan Bhagwat: "आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे वळले तर..." जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

  53

मुंबई: अहिंसा हा भारताचा धर्म आहे, हिंदू धर्माचे ते मुख्य तत्व आहे, यावर भर देत संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी "भारत कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा इजा करत नाही, परंतु जर वाईट कृत्य वाढले तर बचावात प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. असे जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शनिवारी वक्तव्य केले. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्येक स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी देखील या हल्ल्याविरुद्ध जोरदार निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या द हिंदू मेनिफेस्टो नामक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित करताना हे वक्तव्य केले.



काय म्हंटले मोहन भागवत?


अहिंसा हे हिंदू धर्माचे मुख्य तत्व आहे, मात्र आक्रमकांना तोंड देणे आणि विजय मिळवणे हा देखील धर्माचा एक भाग आहे.  रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.


"आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना इजा पोहोचवत नाही. पण जर कोणी वाईटाकडे वळले तर दुसरा पर्याय काय आहे? प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, आणि त्याने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे," असं देखील भागवत पुढे म्हणाले.


भागवत यांनी आपल्या भाषणात चार तत्वांवर भर दिला आहे, ते म्हणाले "सनातन धर्माची खरी समज सध्याच्या काळात महत्त्वाची आहे. हिंदू धर्म सत्य, सुचितता, करुणा आणि तपस्या या चार स्तंभांवर उभा राहिला पाहिजे. याच्या पलीकडे जाणारी प्रत्येक गोष्ट अधर्म आहे,"



हिंदू शांत बसणाऱ्यातले नाही


दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की हल्लेखोरांनी लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीचा भाग नाही. पण शांतपणे हानी सहन करणेही आपला स्वभाव नाही.


पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने या दहशतवादी हल्ल्याचा दावा केला आहे आणि अलिकडच्या काळातल्या सर्वात प्राणघातक घटनांपैकी एक म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे.

Comments
Add Comment

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा