पहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी

  56

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या नोटिफिकेशन जारी केले आहे. आता एनआयए औपचारिकरित्या या बाबत केस दाखल करून विस्तृत तपास करेल.


सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएची टीम आधीपासूनच पहलगाम येथे उपस्थित होती. त्यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले आहे. एजन्सीची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पुरावे शोधत आहे. तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून यासंबंधीची केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाचे कागदपक्ष आपल्या ताब्यात घेईल.


मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीम पहलगाम हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन पुरावे मिळवण्याच्या तयारीत आहे. एनआयएची विशेष टीमने दहशतवादी हल्ल्यात जिवंत बचावलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींसोबतही संपर्क कऱण्यास सुरूवात केली आहे.


पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. यातील सुरूवातीच्या तपासावरून मिळालेल्या माहितीनुसार यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात असू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण प्राप्त कमीत कमी दोन स्थानिक दहशतवाद्यांची मदत मिळाली होती.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या