नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या नोटिफिकेशन जारी केले आहे. आता एनआयए औपचारिकरित्या या बाबत केस दाखल करून विस्तृत तपास करेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएची टीम आधीपासूनच पहलगाम येथे उपस्थित होती. त्यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले आहे. एजन्सीची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पुरावे शोधत आहे. तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून यासंबंधीची केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाचे कागदपक्ष आपल्या ताब्यात घेईल.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीम पहलगाम हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन पुरावे मिळवण्याच्या तयारीत आहे. एनआयएची विशेष टीमने दहशतवादी हल्ल्यात जिवंत बचावलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींसोबतही संपर्क कऱण्यास सुरूवात केली आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. यातील सुरूवातीच्या तपासावरून मिळालेल्या माहितीनुसार यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात असू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण प्राप्त कमीत कमी दोन स्थानिक दहशतवाद्यांची मदत मिळाली होती.
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे.…
मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग…
नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४ मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी…
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…