पहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या नोटिफिकेशन जारी केले आहे. आता एनआयए औपचारिकरित्या या बाबत केस दाखल करून विस्तृत तपास करेल.


सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएची टीम आधीपासूनच पहलगाम येथे उपस्थित होती. त्यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले आहे. एजन्सीची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पुरावे शोधत आहे. तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून यासंबंधीची केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाचे कागदपक्ष आपल्या ताब्यात घेईल.


मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीम पहलगाम हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन पुरावे मिळवण्याच्या तयारीत आहे. एनआयएची विशेष टीमने दहशतवादी हल्ल्यात जिवंत बचावलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींसोबतही संपर्क कऱण्यास सुरूवात केली आहे.


पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. यातील सुरूवातीच्या तपासावरून मिळालेल्या माहितीनुसार यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात असू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण प्राप्त कमीत कमी दोन स्थानिक दहशतवाद्यांची मदत मिळाली होती.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे