पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

Share

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म विचारुन हत्या करण्यात आली. या अतिरेकी हल्ल्यासाठी स्थानिकांनी अतिरेक्यांना मदत केली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात २५ हिंदू पर्यटक ठार झाले. याव्यतिरिक्त एक स्थानिक पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ठार झाला.

सुरक्षा पथकाने अतिरेक्यांच्या मदतनिसांना शोधण्यासाठी १५०० पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीतून अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी शोधले आहे. अतिरेक्यांना १५ जणांनी मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी सुरक्षा पथकाने दहा स्थानिक अतिरेक्यांची घरे उद्ध्वस्त केली. यात लष्कर – ए – तोयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.

पोलिसांनी अतिरेकी हल्ला प्रकरणात एकूण चार रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. अतिरेकी स्थानिकांच्या सहकार्याने हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले. स्थानिकांची मदत होती त्यामुळे अतिरेकी प्रत्यक्ष हल्ला सुरू करेपर्यंत शस्त्र सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणात अतिरेक्यांच्या मदत केल्याचे सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

 

Recent Posts

‘हवा प्रदूषणात’ भारताची स्थिती चिंताजनक

प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…

5 hours ago

मजबूत औद्योगिक धोरण हवे

उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…

5 hours ago

सोने आकाशात, डाळी जमिनीवर…

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…

5 hours ago

शेअर मार्केटमधील शेअर खरेदी-विक्री अर्थात ट्रेडिंगचे प्रकार

डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…

5 hours ago

जल पर्यटनाची नवी दिशा…

- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…

5 hours ago

आमची बेस्ट सक्षम व्हावी…

- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…

5 hours ago