पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म विचारुन हत्या करण्यात आली. या अतिरेकी हल्ल्यासाठी स्थानिकांनी अतिरेक्यांना मदत केली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात २५ हिंदू पर्यटक ठार झाले. याव्यतिरिक्त एक स्थानिक पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ठार झाला.



सुरक्षा पथकाने अतिरेक्यांच्या मदतनिसांना शोधण्यासाठी १५०० पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीतून अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी शोधले आहे. अतिरेक्यांना १५ जणांनी मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी सुरक्षा पथकाने दहा स्थानिक अतिरेक्यांची घरे उद्ध्वस्त केली. यात लष्कर - ए - तोयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.



पोलिसांनी अतिरेकी हल्ला प्रकरणात एकूण चार रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. अतिरेकी स्थानिकांच्या सहकार्याने हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले. स्थानिकांची मदत होती त्यामुळे अतिरेकी प्रत्यक्ष हल्ला सुरू करेपर्यंत शस्त्र सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणात अतिरेक्यांच्या मदत केल्याचे सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

 
Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.