पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म विचारुन हत्या करण्यात आली. या अतिरेकी हल्ल्यासाठी स्थानिकांनी अतिरेक्यांना मदत केली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात २५ हिंदू पर्यटक ठार झाले. याव्यतिरिक्त एक स्थानिक पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ठार झाला.



सुरक्षा पथकाने अतिरेक्यांच्या मदतनिसांना शोधण्यासाठी १५०० पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीतून अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी शोधले आहे. अतिरेक्यांना १५ जणांनी मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी सुरक्षा पथकाने दहा स्थानिक अतिरेक्यांची घरे उद्ध्वस्त केली. यात लष्कर - ए - तोयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.



पोलिसांनी अतिरेकी हल्ला प्रकरणात एकूण चार रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. अतिरेकी स्थानिकांच्या सहकार्याने हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले. स्थानिकांची मदत होती त्यामुळे अतिरेकी प्रत्यक्ष हल्ला सुरू करेपर्यंत शस्त्र सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणात अतिरेक्यांच्या मदत केल्याचे सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

 
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे